Anti-India Posts On Social Media : सामाजिक माध्यमांत देशविरोधी टिपण्या प्रसारित करणार्‍या २६ जणांना ७ राज्यांमधून अटक

पहलगाम येथील आतंकवादी आक्रमण

आसाममधील विरोधी पक्ष ए.आय.यू.डी.एफ्.चा आमदार अमिनुल इस्लाम

नवी देहली – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर देशविरोधी वादग्रस्त टिपण्या करण्याच्या, तसेच जिहादी आतंकवाद्यांचे कौतुक करणार्‍या पोस्ट सामाजिक माध्यमांत प्रसारित केल्याच्या प्रकरणात आतापर्यंत ७ राज्यांतून २६ जणांना अटक करण्यात आली आहे. यांमध्ये आसाममधील विरोधी पक्ष ए.आय.यू.डी.एफ्.चा आमदार अमिनुल इस्लाम, एक पत्रकार, एक विद्यार्थी आणि एक अधिवक्ता यांचाही समावेश आहे.

आसाममधून सर्वाधिक १४ जणांना अटक !

देशद्रोही टिपण्या केल्यामुळे अटक करण्यात आलेले उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांतील आहेत. आसाममध्ये सर्वाधिक, म्हणजे १४ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला आमदार अमिनुल इस्लाम याने ‘वर्ष २०१९ मध्ये पुलवामा येथे आतंकवाद्यांनी केलेले  आक्रमण, तसेच २२ एप्रिल २०२५ या दिवशी पहलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेले आक्रमण, हा सरकारी कट आहे’, असे म्हटले होते. त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राज्यनिहाय अटक केलेल्यांची सूची

मध्यप्रदेशात महाविद्यालयातील अतिथी व्याख्याताला अटक

२५ एप्रिल या दिवशी मध्यप्रदेशातील भोपाळ येथील एका महाविद्यालयात अतिथी व्याख्याता असलेल्या नसीम बानो यांनी पहलगाम येथील आक्रमणानंतर व्हॉट्सॲपवर एक वादग्रस्त व्हिडिओ प्रसारित केला. यानंतर पोलिसांनी नसीम बानो यांना अटक केली. नसीम बानो यांनी दावा केला की, त्यांनी व्हिडिओ बनवला नव्हता. चुकून तो व्हिडिओ व्हॉट्सॲप स्टेटसवर पोस्ट झाला. (प्रथम देशविरोधी कृती करायची आणि नंतर ‘चुकून झाले’, असे सांगत कांगावा करायचा, ही धर्मांध मुसलमानांची जुनी खोड आहे ! – संपादक) यापूर्वी राज्यात अशा प्रकरणांमध्ये आणखी ३ जणांना अटक करण्यात आली आहे. पहलगाम आक्रमणाविषयी छत्तीसगडमधील एका व्यक्तीने माध्यमांत लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेचे कौतुक केले. यासाठी पोलिसांनी त्याला अटक केली.

आसाममधील पत्रकार-विद्यार्थी आणि त्रिपुरातील २ निवृत्त शिक्षकांना अटक !

पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर आसाममध्ये १४ जणांना अटक करण्यात आली. त्यांनी सामाजिक माध्यमांत सरकारविरोधी आणि देशविरोधी टिपण्या केल्या होत्या. त्रिपुरामध्ये ४ जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यात २ निवृत्त शिक्षकांचा समावेश आहे.

आवश्यकता भासल्यास राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करणार ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा, आसाम

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

सामाजिक माध्यमांत देशविरोधी टिपण्या प्रसारित करणार्‍यांच्या विरोधात आवश्यकता भासल्यास राष्ट्रीय सुरक्षा कायदा अर्थात् रासुका लागू करणार, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली. सामाजिक माध्यमांवरील खात्यांचे अन्वेषण चालू आहे. जर कुणी देशद्रोही आढळला, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात काहीही साम्य नाही. दोन्ही देश एकमेकांचे शत्रू आहेत.

संपादकीय भूमिका

अटक करण्यात आलेले एवढे आहेत, तर भारतात पाकप्रेमींची संख्या किती असेल, याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. देशाला जेवढा जिहादी आतंकवाद्यांपासून धोका आहे, तेवढाच धोका त्यांची पाठराखण करून वैचारिक आतंकवाद पसरवणार्‍यांपासून आहे, हे लक्षात घ्या !