श्रीनगर – पहलगाम येथे जिहादी आतंकवाद्यांनी हिंदु पर्यटकांवर केलेल्या आक्रमणानंतर सरकारने आतंकवाद्यांवर कारवाई चालू केली आहे. काश्मीरमध्ये आणखी ३ आतंकवाद्यांची घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत एकूण ९ आतंकवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.
सैन्याधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी २७ एप्रिल या दिवशी बांदिपुरा, पुलावामा आणि शोपियान जिल्ह्यांत ही कारवाई करण्यात आली. शोपियान जिल्ह्यात रहाणारा अदनान शफी याने गेल्या वर्षी आतंकवादी संघटनेत प्रवेश केला होता. त्याचे घर या कारवाईत पाडण्यात आले आहे, तसेच पुलवामात अमीन नाझीर या आतंकवाद्याचे घर पाडण्यात आले आहे. बांदीपोरामध्ये जमील अहमद शेरगोजरी हा लष्कर-ए-तोयबासाठी काम करत होता. त्याचेही घर जमीनदोस्त करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाकाश्मीरमध्ये केवळ आतंकवादीच नव्हे, तर त्यांना साहाय्य करणारे आणि त्यांना पाठिंबा देणारे अशा सर्वांचीच घरे उद्ध्वस्त करणे आवश्यक आहे ! |