१. पहलगाम, काश्मीर येथे आतंकवादी आक्रमण होण्यामागील संबंधित घटक आणि त्यांचे प्रमाण (टक्के) !
टीप १ – हे आक्रमण टाळण्यासाठी सूक्ष्मातून विविध देवता आणि दैवी जीव कार्यरत असल्याने मोठ्या वाईट शक्तींना मोठ्या प्रमाणावर नरसंहार करून पुष्कळ त्रास देता आला नाही. सध्या आक्रमणाच्या संदर्भात वैचारिक गोंधळ आणि भ्रम पसरवून मानसिक अन् बौद्धिक स्तरांवर त्रास देण्यासाठी मोठ्या वाईट शक्ती प्रयत्न करत आहेत.
टीप २ – विविध संत आणि दैवी जीव काश्मीरमध्ये करत असलेल्या सूक्ष्म साधनेमुळे तेथे सात्त्विकता कार्यरत आहे. त्यामुळे तेथे समष्टी प्रारब्धाची झळ बर्याच प्रमाणात अल्प असल्याने जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली नाही. (इस्रायलमध्ये ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या अशाच एका आक्रमणात १ सहस्रहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.)
२. पहलगामच्या आक्रमणाचे प्रत्त्युत्तर म्हणून भारताकडून केल्या जाणार्या शिक्षेतून राजसत्तेत काही अंशी क्षात्रतेज कार्यरत होणार !
समाजाकडून घडलेले अयोग्य क्रियमाण हे एक समष्टी पापच असते. असे समष्टी पाप करणार्यांना राजसत्तेने त्याच वेळी शिक्षा करून न अडवल्यास समाजमनावर ‘स्वच्छंदपणा’, ‘अधिकार गाजवणे’, ‘मनानुसार वागणे’ आणि ‘इतरांना तीव्र त्रास देऊन स्वतः आसुरी आनंद उपभोगणे’, असे अधर्माचरण करण्यास उद्युक्त करणारे विविध कुसंस्कार होतात. त्यांचे फलस्वरूप म्हणून समाजाकडून समष्टी पापाचे आचरण आणि समर्थन केले जाते. ‘समाजमनावरील अधर्माचरणाचे कुसंस्कार नष्ट करणे’, हा राजसत्तेचा (सरकारचा) धर्म असून त्यासाठी त्यांना क्षात्रतेज अंगी बाणवावे लागते. ज्या तेजामुळे जिवाच्या स्थुलातील अयोग्य कृतींसह त्याच्या मनावरील संस्कारही नष्ट होतात, ते तेज म्हणजे ‘क्षात्रतेज’ ! पहलगामच्या आक्रमणाचे प्रत्त्युत्तर म्हणून भारताकडून केल्या जाणार्या शिक्षेतून राजसत्तेत काही अंशी क्षात्रतेज कार्यरत होणार आहे.
३. भारताकडून केल्या जाणार्या शिक्षेत भगवान श्रीकृष्ण, मारुति आणि श्री दुर्गादेवी यांच्यासह विविध दैवी शक्तींनी साहाय्य करणे
राजसत्ता आणि समाज यांनी धर्माचरणाचे प्रयत्न केल्यावर त्यांच्यावर देवतांची आपोआप कृपा होते. भारताकडून केल्या जाणार्या शिक्षेत प्राधान्याने भगवान श्रीकृष्ण, मारुति आणि श्री दुर्गादेवी यांच्यासह विविध दैवी शक्ती (कनिष्ठ देवता, ऋषी-मुनी, क्षात्रतेज असलेले काही दैवी जीव इत्यादी) भारतीय सैन्याला साहाय्य करणार आहेत. ही शिक्षा तेजतत्त्व-वायूतत्त्वप्रधान असून ३ ते ६ मास एवढा त्याचा कालावधी असू शकतो.
४. भारताकडून केल्या जाणार्या शिक्षेमुळे पूर्ण विश्वात तृतीय विश्वयुद्धासाठी दोन पक्ष निर्माण होऊन त्यांच्यात गतीने ध्रुवीकरण होईल !
या शिक्षेमुळे संपूर्ण विश्वात तृतीय विश्वयुद्धासाठी दोन पक्ष निर्माण होऊन त्यांच्यात गतीने ध्रुवीकरण होईल ! हे ध्रुवीकरण इच्छाशक्तीप्रधान असणार आहे. जी राष्ट्रे सध्या स्वतः धर्माचरण करत नसतील; पण त्यांना वैश्विक शांती होण्याची अपेक्षा असेल, ते भारताशी संधी करतील, तर ज्या राष्ट्रांची मानसिकता अधर्मी असेल, ते विरुद्ध पक्षात जातील. थोडक्यात ही घटना येणार्या तृतीय विश्वयुद्धाची स्थुलातील नांदीच आहे.
५. भारतात गृह युद्धासारखी स्थिती निर्माण झाली, तरी क्षात्रतेजाची उपासना अन् साधना यांसाठी हिंदूंना पूरक काळ निर्माण होणे

पहलगाम, काश्मीर येथील घटनेनंतर भारताचे समष्टी प्रारब्ध आणि काळाची प्रतिकूलता यांत वाढ झाली आहे. यामुळे या घटनेनंतर विविध घटनाक्रम घडून भारतातील विविध राज्यांमध्ये दंगली, सामाजिक तेढ, आंदोलने आणि शक्तीप्रदर्शन यांमुळे गृह युद्धासारखी स्थिती निर्माण होणार आहे. यात ‘हिंदु सणांना विरोध, हिंदूंचे मृत्यू, हिंदूंचे स्थलांतर आणि भारताच्या विभाजनाचे प्रयत्न’, यांसारखी संकटे प्राधान्याने असणार आहेत.
असे असले, तरी हा काळ ‘क्षात्रतेजाची उपासना आणि साधना’ यांसाठी पूरक ठरणार आहे. विविध प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितींमुळे हिंदु समाजाकडून विस्मृतीत गेलेल्या क्षात्रतेजाच्या परंपरेचे आचरण परत होणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रयुद्ध, गृहयुद्ध, व्यापारयुद्ध आदी विविध प्रकारच्या अंतर्गत युद्धांमुळे भोगाकडे मार्गक्रमण करणार्या समाजाची विविध प्रकारच्या त्यागाद्वारे साधनेकडे वाटचाल होणार आहे. या काळात हिंदूंनी ‘नामजप, सत्सेवा आणि त्याग’, अशा साधनेच्या तीन अंगांनी प्रयत्न केल्यास त्यांना शीघ्र आध्यात्मिक उन्नती करणे शक्य होणार आहे.
६. ‘सर्वस्वाचा त्याग’, हाच भारताला ‘सनातन (हिंदु) राष्ट्र’ करण्याचा मूळ आधार !
साधनेतील ‘त्याग’ या अंगामुळे व्यक्तीच्या प्रारब्धात पालट होऊन तिच्यामध्ये नवीन क्रियमाण करण्याची शक्ती निर्माण होते. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांसाठी प्रतिकूल असलेल्या काळात प्रत्येक हिंदूने साधना आणि त्यासह तन, मन, धन अन् प्राण यांचा त्याग करण्याची सिद्धता ठेवावी. भारतातील हिंदु समाजाने केलेली त्यागाची सिद्धता युद्धकाळात सैन्याला मनोबल, तर हिंदु समाजाने केलेले धर्माचरण आणि साधना त्यांना आध्यात्मिक बळ देणार आहे.
हिंदूंचा तन आणि मन यांचा त्याग, म्हणजे ‘राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण’ यांसाठी करावयाचे विविध प्रयत्न होत ! यांमुळे ‘हिंदु एकता’, हिंदूंचा धन आणि प्राण यांचा त्याग यांमुळे ‘हिंदु सुरक्षा’, तर ‘हिंदु एकता अन् हिंदु सुरक्षा’ यांमुळे भारतात ‘हिंदु सत्ता’, म्हणजेच सनातन (हिंदु) राष्ट्र निर्माण होणार आहे.
श्री गुरु आणि जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेने राष्ट्र अन् धर्म यांसाठी प्रतिकूल असलेल्या काळात प्रत्येक हिंदूला साधना आणि तन, मन, धन अन् प्राण यांचा त्याग करण्याची प्रेरणा मिळो’, अशी त्यांच्या कोमल चरणी प्रार्थना.’
– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), फोंडा, गोवा. (२४.४.२०२५)
|