मध्यंतरी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रसारातील युवा साधकांचे शिबिर झाले. त्या वेळी युवा साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. या सत्संगात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) हेही उपस्थित होते. सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा काही भाग आपण २६ एप्रिल २०२५ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग येथे दिला आहे.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/906969.html

४. भावजागृतीविषयीची सूत्रे
४ आ. आश्रमातील चैतन्यामुळे साधिकेची भावजागृती होणे आणि ‘भावाश्रूंना डोळ्यांतून बाहेर येऊन गुरुदेवांच्या चरणी लीन व्हायचे आहे’, असे तिला वाटणे
श्री. चेतन राजहंस : ही कु. सावित्री गुब्याड, ती सोलापूरहून आली आहे. ती सामाजिक माध्यमाची (सोशल मीडियाची) ची सेवा करते.
कु. सावित्री गुब्याड (सोलापूर, महाराष्ट्र) : गुरुदेव, आश्रमात आल्यापासून मला पुष्कळ चैतन्य जाणवत आहे आणि कालपासून माझी पुष्कळ भावजागृतीसुद्धा होत आहे. माझे भावाश्रू थांबतच नाहीत. असे वाटते की, या भावाश्रूंनासुद्धा डोळ्यांतून बाहेर यायचे आहे आणि आपल्या चरणी लीन व्हायचे आहे. ‘त्यांनाही कृतज्ञता व्यक्त करायची आहे’, असे वाटले !
परात्पर गुरु डॉ. आठवले : किती सुंदर विचार आहे !
४ इ. भावामुळे युवा साधिकेला प.पू. गुरुदेवांच्या चरणी समर्पित होण्याचा ध्यास लागणे
श्री. चेतन राजहंस : सोलापूरहून कु. सुवर्णा श्रीराम ही साधिका आली आहे. तिला पाककलेची आवड आहे.
कु. सुवर्णा श्रीराम (सोलापूर, महाराष्ट्र) : गुरुदेव, ‘केवळ आपल्याकडे पहातच माझे उर्वरित जीवन व्यतीत व्हावे’, असे मला वाटते. मला आपल्या चरणी समर्पित व्हायचे आहे. आता आणखी काही बोलायचे नाही. मला केवळ आपणच हवे आहात.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हा पहिला गट आहे, ज्या गटातील साधकांमध्ये एवढा भाव आहे. युवावस्थेत भाव जागृत होणे किती कठीण असते; परंतु या गटातील अनेक साधकांमध्ये भाव आहे. फारच छान !
कु. सुवर्णा श्रीराम : आमच्या गुरुदेवांच्या प्रसादस्वरूपात आम्हाला हा भाव मिळाला आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : छान !
(क्रमश:)