आतंकवाद्यांच्या पुढील १० पिढ्यांचा थरकाप उडेल, असा बंदोबस्त करण्याचे प्रशासनाला कळत का नाही ?

‘वर्ष १९७२ मध्ये म्युनिक ऑलिंपिकच्या वेळी इस्रायलच्या खेळाडूंवर पॅलेस्टिनी आतंकवाद्यांनी आक्रमण केले. त्या वेळी इस्रायलने आतंकवादी आणि त्यांचा सूत्रधार यांना अशा पद्धतीने मारले होते की, पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. केंद्र सरकारने इस्रायलच्या पावलावर पाऊल ठेवून आतंकवादी आणि त्यांचे पाठीराखे यांना कायमचे संपवावे. ‘आतंकवाद्यांचा बंदोबस्त असा करा की, त्यांच्या पुढील १० पिढ्यांचा थरकाप उडेल’, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणावरून केंद्र सरकारला ‘एक्स’ खात्यावरून केले आहे.’ (२४.४.२०२५)