हीच निर्वाणीची हाक !

राष्ट्र म्हणजे त्यातील राष्ट्रीय समाज वैभवाला नेणे याचा तरी काय अर्थ ? विद्या-कला, द्रव्य-बल इत्यादींनी या राष्ट्रातील राष्ट्रीय समाजाचे जीवन समृद्ध होणे, त्यांचे जगातील योग्य ते स्थान त्याला पुन्हा मिळणे, त्याचे उदात्त आणि प्रभावी तत्त्वज्ञान अन् संस्कृती जगावर सर्वत्र विस्तार पावणे, ही हिंदु राष्ट्राच्या वैभवाची कल्पना आहे. शरिराने आणि मनानेही जो मनुष्य सुदृढ, निकोप अन् समृद्ध असेल, तर त्याचे जीवन आपण आदर्श समजतो. त्याप्रमाणे राष्ट्राचे शरीर, म्हणजे बल किंवा सैन्यशक्ती आणि मन म्हणजेच समाजातील एक राष्ट्रीयत्वाची भावना यांवर राष्ट्राचे वैभव अजमावता येते. स्वसंरक्षण आणि जातीचे रक्षण करण्यास समर्थ इतके भौतिक सामर्थ्य अन् मानवाच्या सुखसमृद्धीसाठी झटण्याची प्रामाणिक अन् कार्यकारी इच्छा ही दैवी शक्ती या हिंदु राष्ट्रात निर्माण व्हावी, असाच हेतू हिंदु राष्ट्रवादी संघटकांचा आहे.

(साभार : ग्रंथ ‘अज्ञाताची वचने’, संचालक : अमरेंद्र गाडगीळ)