‘२५.९.२०२२ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस साजरा झाला. त्या सोहळ्याच्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. मी सोहळ्यासाठी सिद्ध होत असतांना ‘मी मंदिरात जाणार आहे’, असे मला वाटत होते. मी साडी नेसतांना ‘देवीला साडी नेसवत आहे’, असे वाटून माझी भावजागृती झाली.
२. सोहळा चालू होण्याच्या आधीच मला व्यासपिठावर पांढरा प्रकाश दिसत होता.
३. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ मंदिरातील गाभार्यातील देवी आहेत’, असे वाटणे

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ सोहळ्याच्या ठिकाणी येत असतांना मला ‘मी मंदिराच्या गाभार्यात आले आहे. त्या दोघी गाभार्यातील देवी आहेत’, असे वाटत होते.
४. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना जे अपेक्षित आहे, ते करायचे आहे’, असे वाटणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी उपस्थितांना डोळे बंद करायला सांगितले. त्या वेळी माझे मन शांत झाले. तेव्हा मला वाटले, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ केवळ साधकांचाच विचार करत नाहीत, तर संपूर्ण मानवजातीचा विचार करत आहेत. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना जे अपेक्षित आहे, ते मला करायचे आहे.’
५. मला पुष्कळ आनंद होत होता. मी याआधी असा आनंद कधीच अनुभवला नव्हता. मला माझे अस्तित्व जाणवत नव्हते. ‘मी पोकळीत जात आहे’, असे मला वाटत होते.
६. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन !

सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना साधकांना मार्गदर्शन करायला सांगितले. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘प्रत्येक साधकाने झोकून देऊन प्रयत्न करायला हवेत. देवच सर्वकाही करणार आहे. साधकांचा प्रत्येक श्वास हा गुरुमाऊलींच्या कार्यासाठी असायला हवा. साधकांनी त्यांच्या अंतिम श्वासापर्यंत समष्टीसाठी प्रयत्न करायला हवेत. साधकांनी नेहमी शिकण्याच्या स्थितीत रहावे.’’
७. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे औक्षण करतांना ‘एक देवी दुसर्या देवीचे औक्षण करत आहे’, असे जाणवणे, वातावरणात पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत असणे आणि भावजागृती होणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे औक्षण केले. तेव्हा ‘एक देवी दुसर्या देवीचे औक्षण करत आहे’, असे मला वाटले. तेव्हा ‘हा सोहळा वेगळ्या लोकात होत आहे’, असे मला वाटत होते. त्या वेळी वातावरणात एवढे चैतन्य होते की, मला ते सहन होत नव्हते. माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वहात होत्या. ‘त्या स्थितीतून कधीच बाहेर पडू नये’, असे मला वाटत होते.
८. गुरुमाऊलींच्या जन्मोत्सवाच्या वेळी असलेल्या वातावरणाप्रमाणेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा वाढदिवस साजरा होत असतांनाचे वातावरण असणे
नंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना भेटवस्तू आणि खाऊ दिला. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ गुरुमाऊलींच्या पाया पडल्या. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची भावजागृती झाली आणि त्यांच्या नेत्रांमधून अश्रू वाहू लागले. हे पाहून सर्वांचीच भावजागृती झाली. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा वाढदिवस साजरा होत असतांना अनुभवलेले वातावरण गुरुमाऊलींच्या जन्मोत्सवाच्या वेळी असलेल्या वातावरणाप्रमाणेच वाटत होते.
९. तो दिवस अद्भुत होता. व्यासपिठावर बसलेल्या तिन्ही गुरूंकडून वातावरणात प्रीती आणि आनंद यांची स्पंदने प्रक्षेपित होत होती. माझी भावजागृती होत होती.’
– कु. वैष्णवी गुरव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |