होय, सीमारेषेवरील आतंकवाद हे प्रदीर्घ काळापासून ज्वलंत सूत्र राहिले आहे. आतापर्यंत अनेक आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले आहे; मात्र शेवट झालेला नाही. त्यासाठी कठोर ‘सर्जिकल स्ट्राईक’ (सैन्याने केलेली तात्पुरती कारवाई) आवश्यक आहे. भारतियांचे तात्पुरते स्थलांतर करून आतंकवाद्यांच्या क्षेत्रांत आक्रमण करणे, ही काळाची आवश्यकता बनली आहे. पाकव्याप्त भारतातही असाच प्रयोग केला पाहिजे. आतंकवादाचा नाश हे यापुढे भारताचे ध्येय असले पाहिजे.
९ जून २०२४ पासून जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक आतंकवादी आक्रमणे झाली आहेत. ९ जूनला परराज्यांतील ६ कामगार आणि १ स्थानिक डॉक्टर असे ७ लोक ठार झाले अन् २३ ऑक्टोबर २०२४ या दिवशी ४ जण घायाळ झाले. पुन्हा ऑक्टोबर २०२४ मध्ये पर्वतीय मार्गांना प्रचंड हिमवर्षावाने रोखण्यापूर्वी अंदाजे १२० प्रशिक्षित आतंकवादी असलेल्या ४ लाँच पॅड्सवरून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यास सिद्ध असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी कळवले. त्यानंतर नियंत्रण रेषेपासून (एल्.ओ.सी. – ‘लाईन ऑफ कंट्रोल’पासून) सुरक्षा उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आली होती. अंदाजे १२० आतंकवादी नीलम खोर्यातील ४ लाँच पॅड्सवर तैनात होते. ते पाकिस्तानी सैन्याने सिद्ध केले आहेत आणि लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदिन आणि जैश-ए-महंमद यांसारख्या आतंकवादी संघटनांचे हस्तक आहेत. भारताने विलंब न करता त्यांच्या भागांवर आक्रमणे करून त्यांचा नाश केला पाहिजे.
– श्री. राजेश बाणावलीकर, वेगासवाडो, हडफडे, गोवा.