कोणतीही वाईट गोष्ट नष्ट करायची असेल, तर तिचे मूळ नष्ट करणे आवश्यक आहे. भस्मासुराला नष्ट करण्यासाठी त्याचाच हात त्याच्या मस्तकावर ठेवल्यानंतर तो नष्ट झाला, त्याप्रमाणेच भारतात गेली ३५ वर्षे जिहादी आतंकवाद पसरवणार्या पाकिस्तानला नष्ट करण्यासाठी त्याला त्याच भाषेत उत्तर देऊन नष्ट केल्याविना हा आतंकवाद कदापि नष्ट होणार नाही. गेल्या ३५ वर्षांत भारताचे लक्षावधी नागरिक ठार झाले, तर सहस्रो आतंकवाद्यांना ठार करण्यात आले; मात्र हा आतंकवाद संपलेला नाही, तो सातत्याने लहान-मोठ्या आक्रमणांद्वारे समोर येत असतो. आता काश्मीरच्या पहलगाम या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी झालेल्या आक्रमणात जिहादी आतंकवाद्यांनी २८ हिंदूंना ठार केले. येथे आलेल्या पर्यटकांना त्यांचे नाव विचारून, तर काहींचे कपडे उतरवून त्यांच्या धर्माची ओळख पटवून त्यांना ते हिंदु असल्याने ठार करण्यात आले. वर्ष १९९० नंतर पुन्हा एकदा अशा प्रकारचे आक्रमण आतंकवाद्यांनी केले. यातून गेल्या ३५ वर्षांत भारत या आतंकवाद्यांना मुळासकट नष्ट करू शकला नाही, हे लक्षात येते. या काळात कोणत्या पक्षाचे सरकार होते, यापेक्षा भारताने आतंकवाद मुळापासून नष्ट केला नाही, या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल. काँग्रेसच्या काळात आतंकवाद्यांना बळ मिळाले, तर भाजप सरकारच्या काळात त्यांच्या नांग्या ठेचल्या जात असल्या, तरी मूळ तसेच शिल्लक असल्यानेच पहलगामची घटना घडली. विशेष म्हणजे पहलगाममध्ये ज्या ठिकाणी आता आक्रमण झाले, तेथे आतापर्यंत कधीच आक्रमण झाले नव्हते. काश्मीर आतंकवादग्रस्त असतांना तेथे आक्रमण झाले नाही, ते आता झाले. याचा अर्थ हा आहे की, तुम्ही आतंकवाद्यांना गृहित धरत आला आणि ‘आतंकवाद संपल्याच्या वाटेवर आहे’, असा भ्रम करून घेतला. हा भ्रम याच आतंकवाद्यांनी उधळून भारताला वास्तव दाखवून दिले आहे. भारत जगभरात सांगत होता, ‘आम्ही काश्मीरमध्ये शांतता निर्माण केली आहे. कलम ३७० हटवल्यानंतर म्हणजे जवळपास साडेपाच वर्षांत काश्मीरमध्ये कोणतेही मोठे आक्रमण होऊ दिले नाही.’ एका झटक्यात ते किती चुकीचे आहे, हे दाखवून देण्यात आले.
‘स्ट्राईक’ नको, ‘डिस्ट्रॉय’ (नष्ट) करा !
आता सरकार कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने हालचाली करत असल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतल्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री यांच्याशी प्रत्युत्तर देण्याविषयी चर्चा चालू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहलगाम येथे पोचले आहेत. ही संवेदनशीलता योग्य असली, तरी ‘त्यातून हा आतंकवाद मुळासकट नष्ट करण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत का ?’, हाच मूळ प्रश्न आहे. ‘याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने थोड्याशा यशावर समाधान व्यक्त करून शासनकर्ते आणि जनता अशा घटना विसरत आली आहे, तसे आताही होणार आहे का ?’, असा प्रश्न उपस्थित होतो; कारण उरी आणि पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारताने ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला, ‘एअर स्ट्राईक’ केला त्यातून काही आतंकवाद्यांना ठार करण्यात आणि तात्पुरता धाक निर्माण करण्यात भारत यशस्वी झाला. हे जरी खरे असले, तरी पुन्हा तोच प्रश्न म्हणजे ‘मुळाचे काय ?’ तो कायम राहिल्याने त्याच्यानंतर लहान आक्रमणे झाली आणि आता पुन्हा मोठे आक्रमण झाले. आताही सरकार एखादे ‘स्ट्राईक’ करील आणि सूड घेईल; पण यामुळे काश्मीर किंवा भारतात कुठेही मोठे आतंकवादी आक्रमण होणार नाही आणि हिंदूंचे रक्षण होईल, याची शाश्वती कोण देऊ शकणार आहे का ? तर याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे; कारण पुन्हा मूळ तसेच आहे. म्हणजे जोपर्यंत पाकिस्तानला भारत कायमस्वरूपी धडा शिकवत नाही, तोपर्यंत अशा घटना आज ना उद्या होतच रहाणार आहेत. आताच्या आक्रमणातील २ आतंकवादी पाकिस्तानी होते, हे स्पष्ट झाले आहे. आता याचे अधिक अन्वेषण करून पाकिस्तानला पुरावे सादर केले जातील, पाक पुन्हा ते फेटाळून लावेल. पुढे काय ? यापूर्वीही असेच झाले आहे. भारताने पाकचे काय वाकडे केले ? काहीच नाही. ही वस्तूस्थिती आहे. आज देशातील हिंदूंच्या प्रतिक्रिया ऐकल्या, तर प्रत्येक जण म्हणत आहे की, ‘पाकला कायमची अद्दल घडवा.’ जनतेला जे वाटते, ते शासनकर्त्यांनी करणे आवश्यक आहे. काँग्रेसचे सरकार जनतेने म्हणजेच राष्ट्राभिमानी हिंदूंनी हटवले त्याला ‘आतंकवाद आणि त्यावर न होणारी कारवाई’, हेच मोठे कारण होते. हे लक्षात घेऊन आताच्या सरकारने जनतेची भावना समजून ती पूर्ण केलीच पाहिजे. यात ‘जर-तर’चा विचार करू नये. एखादा मोठा रोग झाला, तर शस्त्रकर्म करून संबंधित अवयव काढावा लागतो, त्याचप्रमाणे आता मोठे शस्त्रकर्म करावेच लागणार आहे. पाककडून भारताला प्रत्युत्तर मिळेल, युद्ध होईल, त्याचे परिणामही अनेक होतील, या सर्व गोष्टी होणार; म्हणून मुळावर घाव घालायचा नाही, हे एका अण्वस्त्रसज्ज राष्ट्राला शोभत नाही. इस्रायलकडून या संदर्भात भारताला शिकावे लागेल. आज इस्लामी देशांनी घेरलेला असतांना आणि हमासकडून अनेक आक्रमणे होत असतांनाही इस्रायल त्यांना जशासतसे प्रत्युत्तर देऊन त्यांचे मूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत रहातो. इस्रायलच्या तुलनेत भारत अनेक पटींनी मोठा असतांना असा हतबल असणे, हे लज्जास्पद म्हणावे लागेल. ‘इस्रायलची जनता भारतावर हसत असेल’, असेच अनेकदा वाटत रहाते.
काश्मिरींची जिहादी मानसिकता नष्ट करा !
आतंकवादाच्या छायेत असतांना होणारा विकास कधीही लाभदायक ठरू शकत नाही. काश्मीरचा मोठ्या प्रमाणात विकास होत असला, तरी अशा प्रकारच्या आतंकवादामुळे त्याचा लाभ कुणाला होणार ? भारत पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेण्याची भाषा बोलत असतो आणि दुसरीकडे अशी आक्रमणे कायमस्वरूपी थांबवू शकत नाही. आजही काश्मीरमधून विस्थापित झालेले हिंदू तेथे जाऊन निर्भयपणे राहू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. काश्मीरमध्ये हिंदूंना आजही शोधून ठार केले जाते. आता पर्यटक म्हणून गेलेल्या हिंदूंना वेचून ठार करण्यात आले. अशी घटना जर पुन्हा होऊ द्यायची नसेल, तर आता आरपारची लढाई करावीच लागणार आहे. त्याच वेळेला काश्मीरमधील जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांना जे आतंकवाद्यांना साहाय्य करत आले आहेत, त्यांनाही धडा शिकवण्यासाठी समांतर कृती करावी लागणार आहे. त्यांना भर चौकात फाशी द्यावी लागेल. तसेच याचाच एक भाग म्हणून हिंदूंना स्वसंरक्षणासाठी शस्त्र हातात देऊन काश्मीरमध्ये वसवावे लागेल.
पाक आणि भारतातील जिहादी मानसिकता यांना नष्ट केले जात नाही, तोपर्यंत भारतातील आतंकवाद संपणार नाही ! |