‘झारखंडमधील काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे मंत्री हाफिजुल हसन अन्सारी यांनी सार्वजनिक कार्यक्रमात ‘मुसलमानांसाठी प्रथम शरीयत, नंतर राज्यघटना’, असे विधान केले. यावरून काही सूत्रे स्पष्ट होतात.
१. हिंदु धर्म, धर्मग्रंथ यांना मान देत नाहीत. ते राष्ट्राचा विचार प्रथम करतात, नंतर धर्माचा ! अन्य पंथ प्रथम त्यांच्या पंथांना, त्यांच्या प्रमाणग्रंथांना महत्त्व देतात. नंतर राष्ट्राचा विचार करतात.
२. या राष्ट्राच्या अखंडतेचा विचार करणारा एकमेव हिंदु समाज आहे. केवळ तोच या राष्ट्राची उन्नती घडवू शकतो. असे असतांना शासनकर्ते हिंदूंकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून अन्य पंथियांचे लांगूलचालन करतात; कारण हिंदु समाज संघटित नाही.
३. हिंदू त्यांच्या धर्माचे पालन करत नसल्याने त्यांचे तेज नष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर त्यांच्याच देशात परागंदा होण्याची वेळ आली आहे. याचे ताजे उदाहरण, म्हणजे वक्फ कायद्याच्या विरोधात मुसलमानांनी मुर्शिदाबाद (बंगाल) येथे केलेल्या हिंसाचारानंतर ५०० हिंदूंनी तेथून पलायन केले.
४. अन्य पंथीय त्यांच्या धर्मातील शिकवणीमुळे एक आहेत. हिंदू त्यांच्या धर्मग्रंथांचा अवमान करतात. त्यांतील शिकवणीकडे दुर्लक्ष करतात; म्हणून जगभरात कुठेही असोत, विभागलेले असतात आणि मार खातात.
जगभरातून येणार्या वृत्तांमध्ये हिंदूंच्या मंदिरांवर, हिंदूंच्या आस्थापनांवर, हिंदूंच्या दूतावासावर आक्रमणे झाल्याची वृत्ते असतात. अन्य पंथीय आणि त्यांचे अनुकरण करणारे देश यांच्या संदर्भात अशा घटना घडल्याची वृत्ते क्वचितच दिसतात. हिंदूंनी त्यांच्याच धर्माकडे तिरस्काराने पाहिल्याने त्यांची ही स्थिती झाली आहे. ‘आज जगभरात काय भारतातही हिंदूंना कुणी वाली नाही’, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.
हिंदूंनो, तुम्हाला तुमचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर ज्यू धर्मियांचा आदर्श घेण्याविना पर्याय नाही, हे लक्षात घेऊन हे राष्ट्र टिकवण्यासाठी साधना करा ! धर्मपालन करा, तरच ईश्वर तुमचे रक्षण करील.’