सुख-दुःख

कोणाचाही संयोग नित्य सुख देणारा नसतो; कारण मनुष्य आपल्या प्राणप्रिय मित्रापासूनही दूर जाऊ इच्छितो. मनुष्याला कोणतीही वस्तू कितीही प्रिय असली, तरीही तो त्या वस्तूपासून कधीतरी दूर जातो. खरोखर एखादी व्यक्ती, वस्तू, देश, काल इत्यादी सुख देणारे असते, तर मनुष्याने त्यांना कधीच सोडले नसते; परंतु असे होत नाही.’

जोपर्यंत मनुष्य जगाकडून अपेक्षा करतो, तोपर्यंत तो कधीच सुखी होऊ शकत नाही; कारण जग हे अनित्य आणि क्षणभंगूर आहे. अशा जगाकडून जे मिळते, त्याचा वियोग निश्चित आहे.

– ब्रह्मलीन श्रद्धेय स्वामी श्रीशरणानंदजी महाराज यांच्या प्रवचनातून संकलित (साभार : मासिक ‘कल्याण’, फेब्रुवारी २०२२)