
समाजाच्या सुखस्वास्थ्यासाठी आणि उन्नती-प्रगतीसाठी धर्माची नितांत आवश्यकता आहे, हे मान्य करण्यास वस्तूत: अडचण असू नये. केवळ शासकीय निर्बंधांनी समाजाचे संरक्षण होऊ शकेल, हा भ्रम आहे. धर्माच्या दृष्टीने चोरी करतो तो चोर आणि म्हणून अपराधी, तर ‘चोरी केली हे सापडून सिद्ध झाले, तर तो अपराधी’, असे स्वरूप शासनव्यवस्थेला अपरिहार्यपणे प्राप्त होते. सत्शील आणि प्रामाणिक रहाण्याची प्रेरणा धर्मामुळे अधिक उत्कटतेने मिळू शकते. ‘धार्मिक म्हणवणारी काही माणसे भ्रष्ट असतात; म्हणून धर्माला नावे ठेवणे’, हे ‘वैद्य पथ्याचे नियम पाळत नाही’; म्हणून वैद्यकशास्त्रच खोटे ठरवण्यासारखे आहे.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ‘श्री उपनिषदार्थ कौमुदी, खंड ४ था’, या ग्रंथातून)