Anurag Kashyap Brahmin Controversy : ब्राह्मणांवर आक्षेपार्ह विधान करणारे चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची क्षमायाचना

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप

नवी देहली – मी हे सगळे बोलून महत्त्वाचे सूत्र बाजूला राहिले. मी मनापासून क्षमा मागतो. मला या समाजाबद्दल बोलायचे नव्हते; पण रागाच्या भरात टीका करतांना ते लिहिले गेले. मी चुकीची भाषा, चुकीचे शब्द वापरल्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या, त्यासाठी माझ्या सहकार्‍यांची, माझ्या कुटुंबाची आणि त्या समाजाची मी क्षमा मागतो, अशा शब्दांत चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ब्राह्मणांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून क्षमा मागितली.

‘यापुढे माझ्याकडून असे पुन्हा होणार नाही, याची मी काळजी घेईन. माझ्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करेन. माझे सूत्र मांडायचे असेल, तर त्यासाठी योग्य शब्दांचाच वापर करीन. आशा आहे की, मला तुम्ही क्षमा कराल, असेही त्यांनी पुढे म्हटले.

काय आहे प्रकरण ?

‘फुले’ चित्रपटावरील वादावर अनुराग कश्यम यांनी सामाजिक माध्यम वापरणार्‍या एका व्यक्तीला उत्तर देताना ‘ब्राह्मणांवर मी लघवी करीन; तुम्हाला काही अडचण आहे का ?’ असे म्हटले होते. यावरून त्यांच्यावर टीका होण्यासह काही ठिकाणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

अनुसूचित जाती आणि जमाती, दलित आदींविषयी आक्षेपार्ह विधान करण्यात आले असते, तर एव्हाना ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद होऊन कश्यप यांना कारागृहात डांबण्यात आले असते; मात्र ब्राह्मणांच्या संदर्भात असा कोणताच कायदा नसल्याने अशांचे फावते आहे !