‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे गोरक्षपीठ पीठाधीश्वर आणि उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – सनातन संस्थेचे चांगले कार्य चालू आहे. या कार्याबद्दल तुमचे अभिनंदन ! सध्या हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत. हिंदूंना अधिकाधिक संघटित करणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक हिंदूंना संघटित करा, असा आशीर्वाद उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनी सनातन संस्थेला दिला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष यानिमित्ताने गोवा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ यांना २१ एप्रिल या दिवशी देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
🕉️ “Unite Hindus in greater numbers!” – Yogi Adityanath, CM of Uttar Pradesh
📜 Invitation extended to Hon. CM Yogi Adityanath & Peethadheeshwar of Goraksha Peeth for the ‘Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav’
Delegation led by MLA Dr. R.K. Patel Ji (@DrRkPatelMLA) & H.H.… pic.twitter.com/FRKCrbSN2D
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 21, 2025
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ‘स्वागत समिती’तील सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, जौनपूरच्या मडियाहू विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. रविंद्रकुमार पटेल आणि श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी उत्तरप्रदेशाची राजधानी लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील मुख्यमंत्री कार्यालयात योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या वेळी प्रथम सनातन संस्थेच्या २५ वर्षांतील कार्याविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी ‘पुढील नियोजन पाहून कार्यक्रमाला येण्याविषयी कळवतो’, असे सांगितले.
मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी महाराज से आज लखनऊ में जनपद जौनपुर के मडियाहूं विधान सभा क्षेत्र से माननीय विधायक डॉ. आर.के. पटेल जी ने शिष्टाचार भेंट की।
इस अवसर पर डॉ. चारुदत्त पिंगड़े जी एवं श्री विश्वनाथ कुलकर्णी जी भी उपस्थित रहे।@DrRkPatelMLA pic.twitter.com/5LjstBwOR4
— Yogi Adityanath Office (@myogioffice) April 21, 2025
या वेळी सनातन संस्थानिर्मित श्रीरामाचे सात्त्विक चित्र असलेली प्रतिमा, तसेच हिंदु जनजागृती समितीने निर्मिलेली ‘हिंदू राष्ट्र आवश्यक क्यो ?’, ‘हिंदू राष्ट्र स्थापना की दिशा’, ‘हिंदू राष्ट्र खंडण एवं आक्षेप’ आणि ‘हलाल जिहाद’ ही पुस्तके मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेट देण्यात आली.