भारतीय निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त एस्.वाय. कुरेशी यांच्यातील ‘मुसलमान’ जागा झाला !
भारतीय निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त एस्.वाय. कुरेशी
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – केंद्र सरकारने केलेला वक्फ कायदा, म्हणजे निःसंशयपणे मुसमलमानांच्या भूमी बळकावण्याची सरकारची भयानक योजना आहे, अशा शब्दांत भारतीय निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त एस्.वाय. कुरेशी यांनी सरकारवर टीका केली. कुरेशी पुढे म्हणाले, ‘‘मला निश्चिती आहे की, सर्वोच्च न्यायालय यावर प्रश्न उपस्थित करील. भाजपच्या अपप्रचार व्यवस्थेने चुकीची माहिती पसरवण्याचे त्यांचे काम उत्तमपणे केले आहे.’’
🚨 Waqf Act is a sinister govt plan to grab Muslim land! – ex-CEC S.Y. Quraishi shows his true colours!
MP Nishikant Dubey: “You weren’t an Election Commissioner, but a Muslim Commissioner!”
Defending Waqf Board’s temple & land grab? Probe his tenure! 🔍🇮🇳
तुम्ही निवडणूक आयुक्त नव्हे, तर मुसलमान आयुक्त होता ! – खासदार निशिकांत दुबे
भाजपचे खासदार निशिकांत दुबे
एस्.वाय. कुरेशी यांच्या या वादग्रस्त विधानावर भाजपचे खासदार निशिकांत दुबे कुरेशी यांना उद्देशून ‘तुम्ही निवडणूक आयुक्त नव्हे, तर केवळ मुसलमान आयुक्त होता’, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. दुबे कुरेशी यांना उद्देशातून पुढे म्हणाले, ‘‘तुमच्या कार्यकाळात झारखंडमधील संथाल परगना जिल्ह्यात असंख्य बांगलादेशी घुसखोरांना भारतीय मतदार बनवले गेले. महंमद पैगबंर यांचा इस्लाम वर्ष ७१२ मध्ये भारतात आला. त्याआधी ही भूमी हिंदू, आदिवासी, जैन आणि बौद्ध यांची होती. आपण या देशातील लोकांची एकजूट वाढवली पाहिजे. देश एकजूट करा, इतिहास वाचवा. या देशाचे दोन तुकडे करून पाकिस्तान जन्माला आला आहे. आता पुन्हा एकदा देशाची फाळणी होणार नाही.’’
नुकतेच दुबे यांनी वक्फ कायद्यावरून भारताच्या सरन्यायाधिशांविषयी ‘भारतातील यादवी युद्धासाठी सरन्यायाधीश संजीव खन्ना उत्तरदायी आहेत’, असे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सरन्यायाधिशांच्या संदर्भातील वक्तव्यापासून अंतर राखले होते.
प्रसिद्धीमाध्यमांचा हिंदुद्वेष !
या घटनेचे वृत्त प्रसारित करतांना सर्वच प्रसिद्धीमाध्यमांनी दुबे यांचे वक्तव्य ठळकपणे प्रसिद्ध केले, तर कुरेशी यांचे वक्तव्य बातमीत खालच्या भागात एक-दोन ओळींत प्रसिद्ध केले.
संपादकीय भूमिका
‘मुसलमान कितीही मोठ्या पदावर असले, तरी ते प्रथम मुसलमान असतात’ असे जे म्हटले जाते, हे कुरेशी यांच्या विधानावरून लक्षात येते. देशाचे उपराष्ट्रपतीपद भूषवणारे हमीद अन्सारी यांनीही यापूर्वी अशाच प्रकारची वक्तव्ये केली होती, हे जनता विसलेली नाही !
यावरून कुरेशी हे हिंदूंची मंदिरे, गरीब हिंदूंची घरे बळकवणार्या वक्फ बोर्डाच्या कृत्याचे समर्थनच करत आहेत ! अशा व्यक्तीने पदावर असतांना पारदर्शक कारभार केला असेल का ? त्यामुळे अशांनी त्यांच्या कारकीर्दीत घेतलेल्या निर्णयांची चौकशी व्हायला हवी !