
हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – बंगाल येथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावे, तसेच तेथील हिंदूंना संरक्षण पुरवावे, या मागणीसाठी हुपरीचे मुख्याधिकारी आणि हुपरी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्या नावे असलेले हे निवेदन हुपरीचे मुख्याधिकारी अजय नरळे यांनी स्वीकारले. या प्रसंगी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. नितीन काकडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री अजित सुतार, प्रवीण पाटील, नितीन खेमलापुरे, विलास पाटील, पोपटराव हांडे, बजरंग दलाचे श्री. शिवराज माळी, समर्थ गायकवाड, सर्वश्री प्रशांत सुतार, सचिन माळी, शिवराज माळी, सुजित देसाई, प्रसाद देसाई, महादेव आढावकर, विश्व हिंदु परिषदेचे श्री. प्रताप भोसले यांसह अन्य उपस्थित होते.
ठाणे येथे बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांची निदर्शने
ठाणे, २० एप्रिल (वार्ता.) – वक्फ सुधारणा कायद्याचे निमित्त करून बंगालमध्ये हिंदूंवर होणार्या नरसंहाराच्या विरोधात येथे बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, दुर्गा वाहिनी, मातृशक्ती आदी हिंदु संघटनांनी निदर्शने केली. ठाणे शासकीय विश्रामगृहाच्या समोर करण्यात आलेल्या निदर्शनांच्या वेळी आंदोलकांनी ‘जय श्रीराम’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. देशभरात हिंदू संघटनांकडून बंगाल सरकारच्या विरोधात क्रोध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे येथेही निदर्शने करण्यात आली.