सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञानप्राप्ती करत असतांना येणारे अडथळे आणि त्यांवरील उपाय !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक देऊ शकणे, तर काही प्रश्नांची उत्तरे देऊ न शकणे, यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !

१ अ. सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांनी सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त करण्यासाठी मागील अनेक जन्म साधना केलेली असणे : ‘सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त करण्यासाठी मागील अनेक जन्मांची साधना लागते. या साधनेच्या बळावर ते विश्वातील दैवी शक्ती किंवा निर्गुण स्तरावरील ईश्वरी तत्त्व यांच्याशी अनुसंधान साधून ज्ञानप्राप्त करण्याची सेवा करू शकतात. जेव्हा विशिष्ट योगमार्गाने केलेल्या साधनेचे, उदा. कर्मयोग किंवा ध्यानयोग यांच्याद्वारे केलेल्या साधनेचे फळ फलिभूत होण्याची वेळ आलेली असते, तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या विशिष्ट प्रश्नाचे उत्तर सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक देऊ शकतात. जेव्हा विशिष्ट योगमार्गाने केलेल्या साधनेचे फळ फलिभूत होण्याची वेळ आलेली नसते, तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या विशिष्ट प्रश्नाचे उत्तर सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक देऊ शकत नाहीत. काही काळाने एखाद्या साधनेचे फळ फलिभूत होते, तेव्हा सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना काही दिवसांनी किंवा काही मासांनी संबंधित विषयाचे ज्ञान मिळते. याउलट जर एखाद्याच्या साधनेचे फळ लवकर फलिभूत झाले, तर सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विशिष्ट विषयाचे भविष्यकाळात मिळणारे ज्ञान वर्तमानकाळात मिळते.

१ आ. उदाहरणे 

१ अ १. वर्तमानकाळात ज्ञान न मिळता भविष्यकाळात मिळणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये विचारलेल्या काही प्रश्नांचे ज्ञान मे २०२३ मध्ये मिळत आहे आणि उर्वरित प्रश्नांचे ज्ञान काही दिवस किंवा एक ते दीड मासानंतर मिळणार आहे.

१ अ २. भविष्यकाळात मिळणारे ज्ञान वर्तमानकाळात मिळणे : ‘२१ प्रकारच्या स्वर्गलोकांचे  पुढील ४००-५०० वर्षांनी कळू शकणारे हे सविस्तर ज्ञान कु. मधुरा भोसले यांना ८.१२.२०२१ या दिवशी मिळाले आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

२. सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त करण्यामध्ये येणारे अडथळे किंवा त्यांना ज्ञान प्राप्त करण्यासाठी असणार्‍या मर्यादा आणि त्यांवर मात करण्यासाठी करायचे उपाय !

२ अ. सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांच्या सूक्ष्म देहांची शुद्धी आवश्यक तितक्या प्रमाणात झालेली नसणे : ज्याप्रमाणे एखाद्या भूमीची मशागत चांगली झाली, तरच तिच्यामध्ये पेरलेल्या बियाणातून रोप उगवून येते. त्याप्रमाणे सूक्ष्म देह आणि सूक्ष्म कोश जितके सात्त्विक आणि शुद्ध असतील, तितके ब्रह्मांडामध्ये सूक्ष्मतम स्तरावर प्रक्षेपित झालेली ज्ञानशक्तीची स्पंदने सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक ग्रहण करू शकतात. सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त करण्यासाठी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांचे विविध सूक्ष्म देह आणि सूक्ष्म कोश यांची आवश्यक तितक्या प्रमाणात शुद्धी झालेली नसेल, तर त्यांना सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त करता येत नाही.

उपाय : त्यासाठी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांनी नियमितपणे आध्यात्मिक उपाय करणे अत्यावश्यक आहे.

२ आ. सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांमधील जिज्ञासा, भाव आणि तळमळ हे घटक अल्प झाल्यास त्यांना दैवी शक्ती किंवा ईश्वर यांच्याशी सतत अनुसंधान रहाता न येणे : ज्याप्रमाणे सुपिक भूमीमध्ये पेरलेल्या बियाणातून उत्कृष्ट रोप उगवते, त्याप्रमाणे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांमध्ये जिज्ञासा, भाव आणि तळमळ हे घटक जितक्या अधिक प्रमाणात असतील, तितके त्यांना उत्कृष्ट दर्जेचे आणि उच्चतम स्तराचे अचूक ज्ञान प्राप्त होते. जिज्ञासेमुळे सूक्ष्म स्तरावरील उच्च पातळीचे आणि काळाचा पडदा ओलांडून ज्ञान मिळते. भावामुळे भावाच्या स्तरावरील सूक्ष्म ज्ञानाची प्राप्ती होते. तळमळीमुळे अचूक आणि उच्चतम दर्जेच्या ज्ञानाची प्राप्ती होते.

उपाय : यासाठी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांनी नियमितपणे भावजागृतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

२ इ. स्वभावदोष आणि अहं वाढल्यामुळे ईश्वराने कृपा न केल्याने सूक्ष्मातून ज्ञानप्राप्ती न होणे : सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांकडे सूक्ष्मातील ज्ञानाचा प्रवाह निर्विघ्नपणे येऊन त्याचे रूपांतर प्रथम विचार आणि त्यानंतर शब्द यांमध्ये होणे आवश्यक असते. सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांमधील स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अधिक असेल, तर हा प्रवाह मध्येच खंडित होतो किंवा स्वभावदोष अन् अहं यांनी युक्त ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे हे ज्ञान दोषपूर्ण असते.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

उपाय : यासाठी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी सारणी लिखाण करणे, स्वयंसूचना देणे इत्यादी प्रयत्न नियमितपणे करावेत.

२ ई. पाताळ आणि नरक येथील मोठ्या वाईट शक्तींनी समष्टी स्तरावर सूक्ष्मातून आक्रमणे करून सूक्ष्मातून त्रास देणे : सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना प्राप्त होणारे सूक्ष्मातील ज्ञान दैनिक ‘सनातन प्रभात’ किंवा सनातनचे ग्रंथ यांमध्ये प्रसिद्ध होते. त्यामुळे जगातील अनेक साधकांना धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र यांचे ज्ञान प्राप्त होऊन त्यांची हिंदु धर्मातील अध्यात्मशास्त्रावरील श्रद्धा वाढते. त्यामुळे ते श्रद्धेने धर्माचरण आणि व्यष्टी अन् समष्टी स्तरांवरील साधना करू लागतात. अशा प्रकारे ‘सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेल्या ज्ञानाचा लाभ समष्टीला होऊ नये’, यासाठी पाताळ आणि नरक येथील मोठ्या वाईट शक्ती सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांवर सूक्ष्मातून सतत आक्रमणे करत असतात. त्यामुळे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना काहीही न सुचणे, वैचारिक गोंधळ होणे, विस्मरण होणे, आकलन न होणे, अचानक थकवा येणे, डोक्यावर पुष्कळ दाब जाणवणे, मन निरुत्साही होणे, मनामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक विचार येणे, विविध शारीरिक व्याधी उफाळून येणे, यांसारखे अनेक प्रकारचे त्रास होतात. त्यामुळे त्यांना सहजरित्या सूक्ष्म ज्ञानाची प्राप्ती करता येत नाही.

उपाय : यासाठी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांनी सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना आध्यात्मिक उपाय विचारून घेऊन नियमितपणे आध्यात्मिक उपायांच्या अंतर्गत प्राणशक्ती वहनानुसार आलेला नामजप प्रतिदिन नियमितपणे पूर्ण करावा. तसेच आवश्यक असल्यास अन्य उपाय, उदा. नारळ किंवा तुरटी यांनी दृष्ट काढणे, विविध उतारे देणे.

२ उ. इतर घटक : अल्पसंतुष्ट वृत्ती वाढणे किंवा लोकेषणेत अडकणे, ईर्षाळू वृत्तीच्या वाईट व्यक्तींची दृष्ट लागणे इत्यादींमुळे सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त करण्यात अडथळे निर्माण होतात. त्याचप्रमाणे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना वैखरी आणि मध्यमा या वाणीच्या स्तरावरील ज्ञान मिळते; परंतु पश्यंती आणि परा या उच्चतम अन् श्रेष्ठतम वाणीच्या स्तरावरील ज्ञान मिळणे कठीण जाते. जेव्हा त्यांची आध्यात्मिक पातळी वाढून ते संत होतील तेव्हा त्यांना पश्यंती आणि सद्गुरु झाल्यावर परा या वाणींच्या स्तरावरील ज्ञानाची प्राप्ती होईल.

उपाय : स्वत:च्या साधनेची गुणवत्ता वाढवण्यासाठी संत, गुरु, सद्गुरु किंवा परात्पर गुरु यांचे मार्गदर्शन घेणे आणि आध्यात्मिक उन्नती करणे.

२ ऊ. सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त करतांना येणारे अडथळे किंवा मर्यादा आणि त्यांवरील उपाय !

३. श्री गुरुकृपेमुळे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांची पातळी अल्प असूनही त्यांना ऋषिमुनींना मिळणार्‍या ज्ञानाप्रमाणे उच्च प्रतीचे ज्ञान मिळणे

सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांची पातळी आणि त्यांची गेल्या जन्मांची साधनाही अल्प आहे ; परंतु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची ज्ञानप्राप्तीची जिज्ञासा अत्यंत तीव्र आणि समष्टीच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. त्यामुळे जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञानप्राप्त करण्यासाठी एखादा प्रश्न देतात, तेव्हा त्या प्रश्नाच्या रूपाने संबंधित विषयाचे वैश्विक स्तरावरील ज्ञानशक्तीतून उत्तर मिळण्याचा संकल्पच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करतात. त्यामुळे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना वैश्विक स्तरावरील ज्ञानशक्तीतून संबंधित प्रश्नाचे समर्पक उत्तर मिळते. त्याचप्रमाणे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना वाईट शक्तींनी चुकीचे ज्ञान दिले, तर ज्ञानाची धारिका पडताळत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ते त्वरित लक्षात येते. अशाप्रकारे  सूक्ष्म ज्ञानप्राप्तकरणारे साधक गुरुकृपायोगानुसार सूक्ष्मातून ज्ञानप्राप्त करण्याची साधना करत असल्यामुळे त्यांच्यावरील श्री गुरुकृपेमुळे त्यांना उच्चतम ज्ञानाची प्राप्ती होते आणि श्री गुरुकृपेच्या कवचामुळे त्यांचे वाईट शक्तींच्या सूक्ष्मातील आक्रमणापासून रक्षणही होते. यावरून ‘कलियुगात ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग किंवा ध्यानयोग या योगमार्गांनुसार साधना करणार्‍या साधकाला सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त करणे कठीण आहे; परंतु गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या साधकाला सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त करणे तुलनात्मक सोपे आहे’, हे सूत्र लक्षात येते. अशाप्रकारे ‘सूक्ष्मज्ञान प्राप्त करणे’, हा एकप्रकारे सूक्ष्म लढाच आहे. या लढ्यामध्ये सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना केवळ श्रीगुरुकृपेमुळेच सुयश प्राप्त होते. यावरून श्रीगुरुकृपेचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्या लक्षात येते.’ श्री गुरूंप्रती कृतज्ञता आणि प्रार्थना

‘आम्हा साधकांवर भरभरून कृपेचा वर्षाव करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेरूपी समष्टी  ज्ञानगुरु लाभले’, यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. त्यांची कृपा आम्हा साधकांवर अशीच अखंड राहो, हीच त्यांच्या चरणी आर्तभावाने प्रार्थना आहे.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०२३)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.