भावभक्तीने, चैतन्याने जीवन सुसह्य करावे !

‘सर्वसाधारण व्यक्ती मायेत अडकल्याने सुख, दुःख भोगत आहे. त्यातच कोरोनासारख्या वैश्विक महामारीमुळे तो अधिकच त्रस्त झाला. त्याला भीषण आपत्काळाला तोंड देण्यासाठी ‘साधना’ करून भक्तीभाव वाढवणे, हाच एकमेव उपाय आहे.

पू. शिवाजी वटकर

क्षणभर सुखी होऊनी मी गगनी उडतो ।
दुसर्‍याच क्षणी दुःखाच्या दरीत पडतो ।
प्रारब्धाने सुखदुःखाच्या दुष्टचक्रात अडकतो ।। १ ।।

कोरोनासम महामारीस तोंड कैसे द्यावे ।
महायुद्ध परिस्थितीला सामोरे कैसे जावे ।
आपत्कालीन जीवन आमुचे असह्य झाले ।। २ ।।

शरण जाऊनी भगवंताचे चरण धरावे ।
साधना करून ‘आत्मबल’ वाढवावे ।
भावभक्तीने जीवन सुसह्य करावे ।। ३ ।।

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद पनवेल.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक