भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचे वक्फ सुधारणा कायद्यावरून विधान

नवी देहली – जर कायदा बनवणे, हे एकमेव सर्वोच्च न्यायालयाचे काम असेल, तर संसद भवन बंद केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी सामाजिक माध्यमांत एक पोस्ट प्रसारित करून व्यक्त केली.
क़ानून यदि सुप्रीम कोर्ट ही बनाएगा तो संसद भवन बंद कर देना चाहिये
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) April 19, 2025
वक्फ सुधारणा कायद्यावरून सर्वाेच्च न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीवरून त्यांनी हे विधान केले आहे.
🛑 "If Courts Make Laws, Why Have a Parliament?"
BJP MP Nishikant Dubey voices strong concerns as the Supreme Court reviews the Waqf Amendment Act.
He accuses the court of overreach and stirring religious tensions. ⚖️
निशिकांत दुबे #SupremeCourtOfIndiapic.twitter.com/IrIhtiSqPI
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 19, 2025
सर्वोच्च न्यायालयात वक्फ कायद्यावरील सुनावणीपूर्वी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले होते की, मला पूर्ण विश्वास आहे की, सर्वोच्च न्यायालय कायदेशीर गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे. उद्या जर सरकारने न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप केला, तर ते चांगले होणार नाही. अधिकारांचे विभाजन योग्यरित्या ठरवले गेले आहे.