BJP MP Nishikant Dubey : जर सर्वोच्च न्यायालयच कायदा करणार असेल, तर संसद बंद करावी !

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचे वक्फ सुधारणा कायद्यावरून विधान

भाजपचे खासदार निशिकांत दुबे

नवी देहली – जर कायदा बनवणे, हे एकमेव सर्वोच्च न्यायालयाचे काम असेल, तर संसद भवन बंद केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी सामाजिक माध्यमांत एक पोस्ट प्रसारित करून व्यक्त केली.

वक्फ सुधारणा कायद्यावरून सर्वाेच्च न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीवरून त्यांनी हे विधान केले आहे.

सर्वोच्च न्यायालयात वक्फ कायद्यावरील सुनावणीपूर्वी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले होते की, मला पूर्ण विश्वास आहे की, सर्वोच्च न्यायालय कायदेशीर गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे. उद्या जर सरकारने न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप केला, तर ते चांगले होणार नाही. अधिकारांचे विभाजन योग्यरित्या ठरवले गेले आहे.