संपादकीय : धर्मांधांच्या कलाकारी हातांचा हिंदूंना विळखा !

रंगरंगोटी हातावरील असो वा चेहर्‍यावरील, महिलांच्या आवडीचा असलेला हा विषय सण-उत्सव, लग्न-समारंभ एवढ्यापुरता मर्यादित न रहाता दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. व्यावसायिक, नोकरदार, गृहिणी, विद्यार्थिनी या प्रत्येक स्तरावरील महिला स्वतःची ठेवण आजच्या काळाला अनुसरून असण्यासाठी प्रयत्नरत दिसतात. महिलांनी स्वतःला टापटीप ठेवणे यात गैर काहीच नाही; पण शारीरिक सौंदर्य खुलवणे आणि मर्यादेपलीकडे वाढलेले महिला स्वातंत्र्य हिंदु महिलांसाठी मारक ठरत आहे. लव्ह जिहादच्या नव्या प्रकारात हिंदु महिलांची फसगत होत असल्याची प्रकरणे पुढे येत आहेत. नुकतेच मथुरा-वृंदावन येथील ‘ब्युटीपार्लर जिहाद’, पुण्यातील ‘सलून जिहाद’ आदी नवे प्रकार पुढे आले. सनातन धर्माचे शक्तीकेंद्र असलेली स्त्री भ्रष्ट करण्याची मोगलांनी चालू केलेली कारस्थाने आज २१ व्या शतकातही जोमाने चालू आहेत. मेंदी काढणारे, केस कापणारे, सौंदर्यवर्धनालयातील कर्मचारी, प्लंबर, सुतारकाम, यंत्रांची दुरुस्ती करणारे असे अनेक लहान लहान व्यवसाय हिंदूंच्या हातांतून केव्हाच सुटून ते धर्मांधांच्या हातात गेले आहेत. त्याच्याच आधारे धर्मांध आणि वासनांध मुसलमान हिंदु महिला अन् मुली यांच्या खासगी जीवनात प्रवेश करून त्यांना सहजतेने फसवण्यात यश मिळवतात.

‘लव्ह जिहाद’चा नवा प्रकार

उत्तरप्रदेशातील मथुरा, वृंदावन, बिजनौर, सहारनपूर, अमरोहा, रामपूर या जिल्ह्यांसह उत्तराखंड, महाराष्ट्रातील पुणे आणि अन्य काही राज्ये येथे सौंदर्यवर्धनालयाच्या (‘ब्युटीपार्लर’च्या) माध्यमातून ‘लव्ह जिहाद’ सर्रासपणे राबवला जात आहे. या घटना केवळ धर्माच्या आधारे नव्हे, तर सामाजिक आणि वैयक्तिक सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर आहेत. हिंदु महिलांना लक्ष्य करून त्यांच्या भावना आणि विश्वास यांच्याशी खेळ केला जात आहे. सौंदर्यप्रसाधन सेवांचा (ब्युटीपार्लर, सलून, स्पा आदींचा) वापर धर्मांध हेतूंनी केला जात असल्याचे सामाजिक माध्यमांद्वारे पुढे येत आहे. या घटनांवरून हे स्पष्ट होते की, केवळ पारंपरिक ‘लव्ह जिहाद’च्या पुढे जाऊन आता पद्धतशीरपणे आणि गुप्तपणे हा आघात केला जात आहे.

एकीकडे भारतात मुसलमान पुरुष ब्युटीपार्लरमध्ये पोचले आहेत, तर विदेशात ‘हिजाब फ्रेंडली’ ब्युटी पार्लर उभे रहात आहेत. मुसलमान महिला हिजाब परिधान करून पार्लरमध्ये जातात, तर भारतात हिंदु महिला पार्लरमध्ये धर्मांधांकडे स्वतःला सोपवून शील गमवत आहेत. खरेतर धर्मांधांच्या कलाकारी हातांचा उद्देश ओळखणे आतातरी अवघड राहिलेले नाही. ताकही फुंकून पिण्याची वेळ आलेली असतांना हिंदु मुली, महिला स्वतःला एखाद्याच्या हातात सोपवतातच कशा ? या आश्चर्यकारक प्रश्नाचे उत्तर काही केल्या सामान्य हिंदूंना मिळनासे झाले आहे. भारतात ‘लव्ह जिहाद’ आहे कि नाही ? यावरच अद्याप शिक्कामोर्तब न झाल्याने त्याची पाळेमुळे भारतातील खेड्यापाड्यांपर्यंत पोचलेली असणार, यात काही शंका नाही. दूरदर्शननंतर आता सामाजिक माध्यमांमुळे ‘जावेद हबीब’सारखे सलून, स्पा गावोगावी पोचले आहेत. त्यामुळे अगदी खेड्यातील महिलाही सौंदर्यवर्धनालयात जाऊन मेनिक्युअर (हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठीची प्रक्रिया), पेडिक्युअर (पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठीची प्रक्रिया) करू लागल्या आहेत. देशातील बहुतांश ‘ब्युटीपार्लर’वर मुसलमानांनी नियंत्रण मिळवले आहे. असे एकही पार्लर नाही, जिथे सौंदर्य उत्पादने विकण्याच्या बहाण्याने मुसलमान विक्रेते जात नाहीत. ९० टक्क्यांहून अधिक मुसलमान मुले पार्लरमध्ये उत्पादन पुरवण्याचे काम करतात, तसेच युनिसेक्स पार्लरमध्ये असणारे कर्मचारीही आता मुसलमान आहेत. मेंदी लावण्याचे कामही बहुतांश मुसलमान मुले करतात. ते हिंदु तरुणी आणि मुली यांना मेंदी लावतात. मेंदी लावण्याच्या काळात अथवा सौंदर्य वाढवण्याच्या काळात त्यांना हिंदु मुलींची सर्व माहिती मिळते. त्यानंतर काही दिवसांनी त्या मुलीशी जवळीक वाढवून तिच्यावर अत्याचार केले जातात आणि नंतर ती मुलगी सुटकेसमध्ये किंवा शीतकपाटात मृतावस्थेत सापडते.

ज्या वेळी एखादी महिला फसवणुकीच्या जाळ्यात अडकते, तेव्हा केवळ तिचे जीवन नाही, तर एक संपूर्ण सामाजिक संरचना ढासळते. विवाहसंस्था, पालकत्व, कुटुंब व्यवस्थापन, धार्मिक संस्कार हे सर्व कमकुवत होऊ लागते. अनेक प्रकरणांमध्ये असेही निदर्शनास आले आहे की, फसवून धर्मांतर झालेल्या मुलींचा वापर आर्थिक फसवणूक, ‘हनीट्रॅप’, देशविरोधी कारवायांमध्ये ‘प्यादे’ म्हणून केला जातो.

यावर उपाय म्हणून हिंदुत्वनिष्ठांनी ‘महिलांना सौंदर्यसेवा पुरवणारी आस्थापने आणि दुकाने येथे मुसलमान कर्मचार्‍यांना बंदी घालण्यात यावी, सर्व पार्लरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि नोंदणी अनिवार्य असावी. परवान्याच्या अटी आणि शर्ती निश्चित कराव्यात’, अशा मागण्या केल्या आहेत. मुळात अशा मागण्या कुणालाही कराव्या लागू नयेत. प्रत्येक वेळी हिंदु महिलांच्या सुरक्षेसाठी हिंदुत्वनिष्ठांना पुढे येऊन कार्य करावे लागणे अपेक्षित नसून भारतातील बहुसंख्य हिंदु समाजातील महिलांना संरक्षण मिळण्यासाठी प्रशासन आणि सरकार यांनीच कृती करणे अत्यावश्यक आहे. महिलांवरील अत्याचारांवर मेणबत्ती मोर्चे, आंदोलने करून, न्यायालयात खटले लढून न थांबता वासनांधांना कठोरातील कठोर शिक्षा, प्रसंगी सार्वजनिक फाशी देण्याची शिक्षा असायला हवी, यात कुणाचे दुमत नसावे.

आता ब्युटीपार्लर, सलून, महिला सेवा केंद्रे आदी ठिकाणी काम करणार्‍या कर्मचार्‍यांची पार्श्वभूमी पडताळली जावी. ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायद्याची कठोर कार्यवाही न झाल्याने हे प्रकार फोफावत आहेत. सरकार, पोलीस यंत्रणा आणि प्रशासन या सर्वांनी मिळून हिंदु महिलेचे अस्तित्व अन् आयुष्य सुरक्षित ठेवण्याच्या दिशेने तातडीने कृती केली पाहिजे.

महिलांनी सजगता वाढवावी !

प्रशासन आणि सरकार यांनी करायच्या उपाययोजनांसह हिंदु महिलांनी स्वतः धर्मशिक्षण घ्यावे, तसेच कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणही घ्यायला हवे. कुणीही नवखी व्यक्ती ओळख वाढवत असेल, तर तिची पार्श्वभूमी, सामाजिक माध्यमे, कुटुंब, गाव यांची निश्चिती करून घ्यायला हवी. हिंदु धर्मातील ज्ञान, श्रद्धा आणि संस्कार हे तुमचे पहिले संरक्षण आहे. ज्यांना स्वधर्माभिमान असतो, ते सहजपणे कुठल्याही जाळ्यात अडकत नाहीत. ब्युटीपार्लर, सलून, शिकवण्या आदी ठिकाणी काम करणार्‍या लोकांच्या पार्श्वभूमीबद्दल प्रश्न विचारण्यास संकोच धरू नये. ‘बंद दरवाज्याच्या मागे काय चालते ?’, हे पहाण्याचा अधिकार प्रत्येक महिलेकडे आहे. महिलाच जर सजग आणि सशक्त असतील, तर कोणतीही फसवणूक, कटकारस्थान किंवा धोका भारताला पोखरू शकत नाही. लव्ह जिहादसारख्या संकटाला रोखण्यासाठी सरकारपेक्षा सजग महिलांचा आवाज अधिक बलवान हवा.

सौंदर्य सेवांसारख्या सुरक्षित मानल्या जाणार्‍या क्षेत्रातही वाढलेला लव्ह जिहादचा धोका ओळखून हिंदु महिलांनी सक्षम व्हावे !