समर्थ रामदासस्वामी यांनी महाराष्ट्र धर्म वाढवण्याविषयी केलेला उपदेश

मराठा तितका मेळवावा । आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा ।
येविषयीं न करितां तकवा । पूर्वज हांसती ।।

– श्रीसमर्थांच्या प्रासंगिक कविता, क्षात्रधर्म, ओवी १३

अर्थ : सर्व मराठ्यांना एकत्र करावे आणि सर्वत्र महाराष्ट्र धर्म वाढवावा. हे कार्य करण्यासाठी परिश्रम घेतले नाहीत, तर पूर्वज आपला उपहास करतील.

(साभार : ग्रंथ ‘अज्ञाताची वचने,’ संचालक : अमरेंद्र गाडगीळ)