‘सावंतवाडी तालुक्यातील निगुडे ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आर्थिक गैरव्यवहार आणि कामात अनियमितता केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी १५ एप्रिल २०२५ या दिवशी उपोषण चालू केले होते. त्यानंतर रात्री ‘तुम्ही केलेल्या मागणीनुसार कार्यवाही करण्यात येईल’, असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर गवंडे यांनी उपोषण स्थगित केले; मात्र ‘आश्वासनानुसार ८ दिवसांत कार्यवाही न झाल्यास पुन्हा उपोषण करण्यात येईल’, अशी चेतावणी गवंडे यांनी दिली.’ (१७.४.२०२५)