
‘नाशिक येथील काठे गल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा १६ एप्रिल २०२५ च्या पहाटे ५.३० वाजता हटवण्यात आला. दर्ग्याच्या तोडकामाला १५ एप्रिलच्या रात्रीच प्रारंभ करण्यात आला होता. तेव्हा मौलवी, प्रतिष्ठित नागरिक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाने सातपीर दर्गा हटवण्याचा आदेश दिल्याने मौलवी आणि प्रतिष्ठित नागरिक यांनीही तशी सिद्धता दर्शवली होती; पण तोडकामाच्या वेळी ४०० मुसलमानांच्या जमावाने येऊन तेथे दगडफेक केली. यामुळे तणाव निर्माण झाला. या वेळी ५०० पोलीस तैनात होते.’ (१७.४.२०२५)