सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची संशोधकवृत्ती !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना खूप थकवा असल्यामुळे त्यांचे खोलीतून बाहेर निघणे फारसे होत नाही. असे असले तरी त्यांच्या खोलीच्या खिडक्यांमधून दिसणार्या निसर्गाचे ते नियमित निरिक्षण करत असतात. त्यांच्या खोलीच्या खिडक्यांसमोर डोंगर असून त्याच्या वरील विविध झुडुपांचा आकार काही वेळा चेहर्याप्रमाणे होतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना तसे काही लक्षात आले की, ते लगेच खोलीत त्यांची सेवा करणार्या साधकांना कौतुकाने दाखवतात.’
– कु. प्रांजली शिरोडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
ईश्वराने दिलेल्या धनाचा काटकसरीने वापर करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या तोंडाला कोरड पडत असल्यामुळे ते दिवसभरात मध्ये मध्ये श्रीखंडाच्या अथवा जेम्सच्या गोळ्या किंवा खडीसाखर चघळतात. या गोळ्या चघळण्यापूर्वीही ते विचारतात की, ‘यातील स्वस्त कोणते आहे ? म्हणजे ते मी जास्त खाईन.’
– कु. प्रांजली शिरोडकर (११.२.२०२५)
चि. रामदास गोडसे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. प्रथमच आश्रमात आल्यावर तत्परतेने पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणे
‘चि. रामदास परीक्षा संपल्यानंतर आश्रमजीवनाचा अनुभव घेण्यासाठी पहिल्यांदाच रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ८ दिवसांसाठी गेला होता. त्यानंतर तो लगेचच पूर्णवेळ साधना करू लागला. त्याला साधनेची आवड आणि जीवनातील साधनेचे महत्त्व ठाऊक असल्याने त्याने हा निर्णय तत्परतेने घेतला.
२. मनाने निर्मळ असणे
चि. रामदासच्या मनात कुणाविषयी द्वेष नसतो. त्याचे मन निर्मळ आहे. आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये, याची तो काळजी घेतो.
१ इ. रामदास इतरांकडून कोणतीही अपेक्षा न करता त्यांना साहाय्य करतो.
३. आसक्ती नसणे
१. रामदास काटकसरी आहे. त्याला कपडे, खाणे-पिणे किंवा अन्य कोणत्याही गोष्टीची आसक्ती नाही.
२. रामदास वर्षातून एकदाच गावी घरी येतो; पण तो मला (आईला) कधीही ‘खाण्यासाठी नवीन पदार्थ बनव’, अशी मागणी करत नाही.
४. वेळेचा सदुपयोग करणे
रामदास घरी आल्यावर मित्रांच्या समवेत फिरण्यात किंवा बोलण्यात वेळ वाया घालवत नाही. तो घरी आला की, घर स्वच्छ करणे, झाडांची चांगल्या प्रकारे निगा राखणे इत्यादी गोष्टी करतो.
५. प्रेमभाव
रामदासची त्याच्या आजीशी विशेष जवळीक आहे. तो तिच्याशी अधिक बोलतो आणि तिची काळजी घेतो.
वरील सूत्रे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी आमच्याकडून लिहून घेतली. त्याविषयी आम्ही त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– सौ. अनिता गोडसे (श्री. रामदास यांची आई) आणि श्री. रमेश गोडसे (श्री. रामदास यांचे वडील), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.२.२०२५) ०
चि.सौ.कां. प्रांजली शिरोडकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. आश्रमजीवनात रमणारी आणि मायेची ओढ अल्प असलेली कु. प्रांजली !
‘कु. प्रांजली ही नात्याने माझी भाची (चुलत बहिणीची मुलगी) लागते. तिच्याशी माझी पहिली भेट २ वर्षांपूर्वी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झाली. यापूर्वी माझी प्रांजलीशी कधी भेट झाली नव्हती. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असल्यामुळे गुरूंच्या कृपेमुळेच तिची आणि माझी भेट होऊन हे मायेतील नातेही आध्यात्मिक स्तरावरचे झाले आहे.
प्रांजलीने पुण्यासारख्या शहरात शिक्षण घेतलेले असूनही तिचे रहाणीमान अगदी साधे आहे. तिच्या गरजाही पुष्कळ अल्प आहेत. तिच्यामध्ये मायेची ओढही अल्प आहे. त्यामुळे तिने कमी कालावधीत आश्रमजीवनाशी जुळवून घेतले. तिचे आई-वडील साधना करत असल्यामुळे त्यांनीही तिला व्यावहारिक जीवनात न अडकवता साधना करण्यासाठीच प्रोत्साहन दिले.
२. संतसेवा करण्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेणे
आश्रमात आल्यावर प्रांजलीला एका संतांची सेवा करण्याची संधी मिळाली. या सेवेचा तिने आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेतला. या सेवेतून तिला अनेक गोष्टी शिकता आल्या आणि ‘प्रत्येक कृती आध्यात्मिक स्तरावर परिपूर्ण कशी करायची ?’, हे शिकायला मिळाले. ती संतांच्या सेवेतील प्रत्येक कृती भावपूर्ण आणि परिपूर्ण रीतीने करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे ते संतही तिचे नेहमी कौतुक करतात आणि साधनेत प्रगती करण्यासाठी तिला प्रोत्साहन देतात. संतांच्या कृपेमुळेच तिला सतत भावावस्थेत रहाता येते.
कु. प्रांजलीकडून मला सतत शिकण्याची संधी मिळते. यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे. तिच्या पुढील वैवाहिक जीवनातही तिला गुरुचरणांची अखंड सेवा करण्याची संधी मिळो’, अशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करतो.’
– श्री. भूषण केरकर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के (वय ४९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.४.२०२५)
भगवदभेटीचा मार्ग दाविती परात्पर गुरु डॉक्टर आमचे महान ।
‘मी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात राहून साधना करते. ९.१.२०२५ या दिवशी गुरुदेवांच्या संदर्भातील प्रसंग आठवून माझी भावजागृती होत होती. तेव्हा मला खालील कविता सुचली.
‘देव इतके का करतो ?’, ।
असा विचार येई मनात ।। १ ।।
असे तो भावाचा भुकेला ।
म्हणूनच येई भक्तांच्या हाकेला ।। २ ।।
सगुणातील भेटीला त्याच्या असे मर्यादा ।
साधकहृदयी मात्र वसतो तो सर्वदा ।। ३ ।।
उदास असता मन साधकांचे ।
कळवळे हृदय गुरुमाऊलींचे ।। ४ ।।
आश्वस्त करती बोल तयांचे ।
‘चिंता नको, होईल सर्व छान तुमचे’ ।। ५ ।।
नेत्रात असे वात्सल्यभाव ।
हसणे म्हणजे बालकभाव ।। ६ ।।
गुरूंविषयी असे मनी शिष्यभाव ।
अन् साधकांप्रती कृतज्ञताभाव ।। ७ ।।
गुरु सांगती, ‘मजहून श्रेष्ठ तो भगवंत’ ।
परि मन म्हणत असे, ‘तुम्हीच तो भगवंत’ ।। ८ ।।
अज्ञानी आम्ही बालक तयांचे लहान ।
भगवद्भेटीचा मार्ग दाविती गुरु आमचे महान ।। ९ ।।’
– कु. प्रांजली नारायण शिरोडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.३.२०२५)
उखाणेवधू आणि वर या दोघांसाठी उपयोगी पडतील, असे उखाणे • श्रीकृष्णाच्या कृपेने लाभले परात्पर मोक्षगुरु । • श्री गुरुकृपेने मिळाली साधनेची संधी । |