हिंदूंनी स्थलांतर करण्यासाठी घराबाहेर लावले घरांच्या विक्रीचे फलक
नवी देहली – देहलीतील सीलमपूर येथे १७ एप्रिलला रात्री ८ वाजता १७ वर्षीय हिंदु मुलगा कुणाल याची मुसलमानांकडून चाकूने वार करून हत्या करण्यात आली. यानंतर येथे संतप्त नागरिकांनी रस्ता बंद आंदोलन केल्याने तणाव निर्माण झाला. येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही हत्या वैमनस्यातून झाल्याचे सांगितले जात आहे.
📍Salempur, Delhi: Hindu youth murdered by Muslims — Hindu families now putting up “House for Sale” signs, preparing to flee! 🪧🚨
This isn’t happening in an Islamic nation — but in the National Capital!
A shame for Hindu society & its organizations!
How are Hindus still being… pic.twitter.com/AFXsreMsfm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 19, 2025
हिंदूंनी लावले पलायन करण्याचे फलक !
या घटनेनंतर येथील हिंदु कुटुंबांनी त्यांच्या घराबाहेर स्थलांतर करण्याच्या संदर्भातील फलक लावले आहेत. ‘हिंदू स्थलांतरित होत आहेत, योगीजी कृपया साहाय्य करा’, ‘हे घर विक्रीसाठी आहे’, ’हिंदू धोक्यात आहेत’, असे फलक लावण्यात आले आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी यांना साहाय्यासाठी आवाहन केले आहे.
मृत कुणाल याच्या आईने म्हटले की, आम्ही घर विकून येथून निघून जाण्याचा विचार करत होतो. माझा मुलगा जाईल, असे मला कधीच वाटले नव्हते. माझ्या मुलावर दुसर्याचा राग काढला गेला आणि मुलाचा त्यात काहीही संबंध नव्हता.
कुणालचे वडील म्हणाले की, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी ४-५ मुलांना माझ्या मुलावर आक्रमण करतांना पाहिले. यापूर्वी अनेक हिंदु कुटुंबांनी हा परिसर सोडला आहे आणि आता इतरही तेथून जाण्याचा विचार करत आहेत.
संपादकीय भूमिका
|