पाकच्या सैन्यदलप्रमुखांच्या विधानावरून भारताने सुनावले

नवी देहली – पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी काश्मीरविषयी केलेल्या विधानाला भारताने प्रत्युत्तर दिले आहे. मुनीर म्हणाले होते की, ‘काश्मीर पाकच्या गळ्याची नस आहे.’ यावर भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले की, विदेशी वस्तू पाकच्या गळ्याची नस कशी होऊ शकते ? काश्मीर भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. तो पाकला रिकामा करावा लागेल.
🇮🇳 Pakistan will have to vacate Pakistan-occupied Kashmir!
India responds strongly to Pak Army Chief’s remarks.
“POK won’t be freed just by words — force may be needed. The real question is: when will India act?” 💥#AsimMunirpic.twitter.com/fwXTagDJuU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 18, 2025
जैस्वाल यांनी पाकिस्तानच्या द्विराष्ट्र सिद्धातांच्या विधानावर म्हटले की, हा सिद्धांत वर्ष १९७१ मध्ये बांगलादेश स्वातंत्र्यानंतर फेटाळला होता.
संपादकीय भूमिकाभारताने सांगितले आणि पाकने पाकव्याक्त काश्मीर सोडले, असे होणार नाही, तर भारताला त्यासाठी बळाचा वापर करावा लागणार आहे. भारत त्यासाठी कधी कृती करणार आहे ? |