Pakistan Will Have To Vacate POK : पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीरमधून बाहेर पडावे लागेल !

पाकच्या सैन्यदलप्रमुखांच्या विधानावरून भारताने सुनावले

रणधीर जैस्वाल

नवी देहली –  पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी काश्मीरविषयी केलेल्या विधानाला भारताने प्रत्युत्तर दिले आहे. मुनीर म्हणाले होते की, ‘काश्मीर पाकच्या गळ्याची नस आहे.’ यावर भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले की, विदेशी वस्तू पाकच्या गळ्याची नस कशी होऊ शकते ? काश्मीर भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. तो पाकला रिकामा करावा लागेल.

जैस्वाल यांनी पाकिस्तानच्या द्विराष्ट्र सिद्धातांच्या विधानावर म्हटले की, हा सिद्धांत वर्ष १९७१ मध्ये बांगलादेश स्वातंत्र्यानंतर फेटाळला होता.

संपादकीय भूमिका

भारताने सांगितले आणि पाकने पाकव्याक्त काश्मीर सोडले, असे होणार नाही, तर भारताला त्यासाठी बळाचा वापर करावा लागणार आहे. भारत त्यासाठी कधी कृती करणार आहे ?