India Hits Back Bangladesh Murshidabad Remark : बांगलादेशाने भारताऐवजी आधी स्वतःच्या देशातील स्थितीकडे पहावे !

मुर्शिदाबाद हिंसाचारावरून प्रतिक्रिया व्यक्त करणार्‍या बांगलादेशाला भारताने सुनावले

भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल व बांगलादेशाचे मुख्य सल्लागार महंमद युनूस

नवी देहली – बांगलादेशाने आधी स्वतःच्या देशाकडे पहावे. आमच्या देशातील विषयात नाक खुपसण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बंगालमधील मुर्शिदाबाद येथील हिंसाचारावर बोलणार्‍या बांगलादेशाला सुनावले.

१. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, बंगालमधील घटनांविषयी बांगलादेशाने केलेली विधाने आम्ही नाकारतो. बांगलादेशामध्ये अल्पसंख्यांकांच्या चालू असलेल्या फसवणुकीविषयी भारत चिंता व्यक्त करत असतांना, त्या घटनांच्याशी समानता दाखवण्याचा बांगलादेशाचा हा छुपा आणि कपटी प्रयत्न आहे. अनावश्यक टिपण्या करण्याऐवजी बांगलादेशाने स्वतःच्या देशातील अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचे रक्षण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

२. मुर्शिदाबादमधील हिंसाचारानंतर बांगलादेशाने ‘अल्पसंख्यांक मुसलमानांचे रक्षण करावे’, असे म्हटले होते. बांगलादेशाचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांचे प्रसारमाध्यम सचिव शफीकुल आलम म्हणाले की, मुर्शिदाबादमधील घटनेशी बांगलादेशाचा संबंध जोडण्याचा आम्ही तीव्र विरोध करतो.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेशाला शब्दांची भाषा समजत नसल्याने त्याला आता शस्त्रांच्या भाषेत सुनावण्याची आवश्यकता आहे. तसे धाडस भारत कधी दाखवणार ?
  • भारताची इस्रायलशी मैत्री असली, तरी त्याच्याकडून गुण आत्मसात केलेले नाहीत. ते आत्मसात करून त्याप्रमाणे वागल्यास भारताकडे डोळे वर करून पहाण्याचे कुणाचेच धाडस होणार नाही !