
१. श्री. नानासाहेब उजवणे, अकोला
अ. ‘आश्रमात पुष्कळ चांगले वाटले. आजच्या आधुनिक जीवनातही ‘आपण सर्व साधक सनातन धर्माशी किती निगडित आहात’, हे येथे आल्यावर समजले. आज आपल्या राष्ट्राला या आश्रमासारख्या अनेक आश्रमांची आवश्यकता आहे.
आ. आपले कार्य प्रशंसनीय आणि प्रेरणादायी आहे. असेच कार्य आपल्याकडून घडत राहो !’
२. सौ. दीप्ती ललित रूमाले, यवतमाळ
अ. ‘इथल्या चराचरात भगवंताचा वास आहे’, याची मला अनुभूती आली.
आ. आश्रमातील चैतन्यदायी वातावरण प्रसन्न करणारे आहे.’
(सर्व सूत्रांचा दिनांक २९.१२.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार मान्यवरांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |