Pakistan Army Chief On Two Nation Theory : आपण हिंदूंपेक्षा वेगळे असल्यामुळेच २ देश निर्माण झाले !

पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर यांचे विधान

पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर

इस्लामाबाद (पाकिस्तान) – तुम्ही तुमच्या मुलांना पाकिस्तानची गोष्ट सांगितली पाहिजे. आपल्या पूर्वजांना वाटायचे की, आपण हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. आपले विचार, आपल्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत; म्हणूनच आपण एक देश नाही, तर २ देश आहोत. आपल्या पूर्वजांनी या देशासाठी बलीदान दिले आहे. त्याचे संरक्षण कसे करायचे ?, हे आपल्याला ठाऊक आहे, असे मार्गदर्शन पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी येथे केले. ते पहिल्या परदेशी पाकिस्तानी परिषदेत बोलत होते. या परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काश्मीरचे वर्णन ‘पाकिस्तानच्या गळ्याची नस’ असे केले. त्यांनी दावा केला की, ‘काश्मीरला कुणीही पाकिस्तानपासून वेगळे करू शकत नाही.’ याखेरीज गाझा पट्टीला ‘पाकिस्तानी लोकांचे हृदय’ म्हणून वर्णन केले.

सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी केलेली विधाने

१. पाकिस्तानचा पाया ‘कलमा’वर (इस्लामच्या मूलभूत तत्त्वावर) आहे. आपण प्रत्येक गोष्टींत हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. आपला धर्म, चालीरीती, संस्कृती, विचारसरणी आदी  सर्व वेगळे आहे. हा द्वि-राष्ट्र सिद्धांताचा पाया होता.

२. आजपर्यंत केवळ २ संस्थानांचा पाया लेखणीवर रचला गेला होता. प्रथम ‘रियासत-ए-तैयबा’ कारण तैयबाचे नाव महंमद पैगंबर यांनी ठेवले होते. आज त्याला ‘मदीना’ म्हणतात, तर १ सहस्र ३०० वर्षांनंतर अल्लाने दुसरे राज्य, म्हणजे पाकिस्तान निर्माण केले.

३. आतंकवाद्यांच्या १० पिढ्याही बलुचिस्तान किंवा पाकिस्तान वेगळे करू शकत नाहीत. जर भारतीय सैन्याचे १३ लाख सैनिक आपल्याला हादरवू शकत नाहीत, तर हे आतंकवादी आपला निर्धार कसा मोडू शकतात?, असा दावाही त्यांनी बलुचिस्तानमध्ये होणार्‍या बलुच लिबरेशन आर्मीच्या आक्रमणांवर केला.

मुनीर यांनी दोन्ही देशांची वैचारिक दरी केली स्पष्ट ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी जनरल मुनीर यांच्या विधानावर टीका करतांना म्हटले की, जेव्हा पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख स्वतः दोन्ही देशांमधील वैचारिक दरी इतकी स्पष्ट करत आहेत, तेव्हा भारतानेही आता कोणत्याही ‘बंधुत्वाची’ अपेक्षा करू नये.

आपल्यालाही आपल्या धर्म, सभ्यता आणि सामर्थ्य यांचा अभिमान असला पाहिजे, जेणेकरून कुणीही भारताकडे वाकड्या दृष्टीने पाहू शकणार नाही.

संपादकीय भूमिका

  • पाकिस्तान असो किंवा बांगलादेश ते हिंदूंपेक्षा वेगळे तेव्हा झाले, जेव्हा काही शतकांपूर्वी तेथील हिंदूंचे तलवारीच्या बळावर धर्मांतर करून त्यांना मुसलमान करण्यात आले. आता ते कट्टर मुसलमान झाले आहेत आणि उर्वरित हिंदूंना नष्ट करत आहेत !
  • मुसलमान हिंदूंपेक्षा वेगळे असल्यानेच पाकिस्तान मुसलमानांसाठी आणि भारत हिंदूंसाठी होता. तरीही मुसलमान भारतात राहिले आणि ते आणखी एक पाकिस्तान बनवण्यासाठी प्रयत्न रत आहेत. इतकेच नाही, तर ते भारताचाच पाकिस्तान करू इच्छित असतांना ढोंगी आणि आत्मघाती हिंदु निधर्मीवादी लोक मुसलमानांचीच बाजू घेऊन हिंदूंवर अन्याय करत आहेत, हे लक्षात घ्या !