पारपत्राची मुदत संपून ९ वर्षे उलटली !

नंदुरबार – जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील ‘जामिया इस्लामिया इशातुल उलूम संस्था’ या मदरशात २ येमेन नागरिक अवैधपणे वास्तव्यास असल्याचे जिल्हा विशेष शाखेच्या निदर्शनास आले होते. खालेद इब्राहीम सालेह अल-खदामी आणि त्याची पत्नी खादेगा इब्राहीम कासीम अल-नाशेरी अशी त्यांची नावे आहेत. येथील ‘फूड इंडस्ट्रीज’ या आस्थापनाशी व्यापार करण्यासाठी व्यापारी व्हिसा घेऊन ते भारतात आले होते. मुलाच्या औषधोपचारासाठीही वैद्यकीय व्हिसा घेतला होता. त्याच्या पारपत्राची मुदत ६ डिसेंबर २०१५, तर त्याच्या कुटुंबाच्या पारपत्राची मुदत १९ डिसेंबर २०१६ पर्यंतच वैध होती; पण तरीही ते अद्याप येथे अवैधपणे रहात होते.
खालेद ४ जानेवारी २०१६ या दिवशी एका कार्यक्रमात सहभागी झाल्यावर परकीय नागरिक कायद्यानुसार अटक करण्यात आली; पण नंतर त्याची जामिनावर मुक्तताही झाली. मुदत संपून अनेक वर्षे होऊनही ते येथेचे वास्तव्यास आहेत. त्यांना आसरा देणार्यांवरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी करण्यात येत आहे.
राज्यातील सर्व मदरशांची चौकशी करावी !मत्स्य व्यवसाय आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे यांची मागणी या प्रकरणी मत्स्य व्यवसाय आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे म्हणाले, ‘‘मदरशांतून शिक्षण दिले जाते, असे म्हटले जाते; पण जर अशा प्रकारच्या घटना उघड होत असतील, तर शिक्षणाच्या नावाखाली मदरसे हवेत कशाला ? अतिरेक्यांचे अड्डे म्हणून चालवले जाणारे मदरसे बंद करावेत. राज्यातील सर्व मदरशांची चौकशी करून तेथे शोधमोहीम राबवायला हवी. मदरशांच्या आत काय चालू आहे ? तेही पहायला हवे. अतिरेक्यांना पोसणारे मदरसे हवेत कशाला ?’’ |
संपादकीय भूमिका
|