भारत-बांगलादेश सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या कथित बांधकामाचे प्रकरण
(समन्स म्हणजे न्यायालय किंवा सरकार यांच्याकडून संबंधितांना माहिती देण्यासाठी बोलावणे)

नवी देहली – बांगलादेशाने तेथील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना समन्स बजावून त्यांना जाब विचारल्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशाचे उप उच्चायुक्त नरूल इस्लाम यांना समन्स बजावून त्यांना जाब विचारला. भारत-बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या कथित हालचालींबद्दल बांगलादेशाने चिंता व्यक्त केली होती.
१. बांगलादेशाने म्हटले आहे की, भारत हा सीमेवर ५ ठिकाणी सुरक्षा कुंपण करण्याचे प्रयत्न करत आहे. हे उभय देशांत झालेल्या कराराचे उल्लंघन आहे.
२. बांगलादेशाच्या परराष्ट्र मंत्रालयातील भेटीनंतर भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी सांगितले की, या बैठकीत तस्करी, तसेच गुन्हेगारी कृत्ये या सूत्रांवर चर्चा झाली. गुन्हेगारीमुक्त सीमारेषा करण्याच्या दिशेने चर्चा झाली.
३. भारत-बांगलादेश सीमेवरील चपैनवाबगंज, नौगाव, लालमोनिरहाट आणि ३ बिघा कॉरिडोर येथे सीमा सुरक्षा दलाच्या कामावर बांगलादेशाने आक्षेप घेतला आहे.
संपादकीय भूमिकाबांगलादेशाकडून अशा प्रकारचे कृत्य करणे, हा भारताला डिवचण्याचा प्रयत्न आहे. भारताने याला गांभीर्याने घेतले नाही, तर तो डोक्यावर बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच बांगलादेशाला त्याची जागा दाखवणे आवश्यक आहे ! |
India-Bangladesh Border Tension: Both countries summoned each other’s High Commissioners and questioned them!
The issue of alleged construction by the Border Security Force on the India-Bangladesh border
Such actions by Bangladesh are an attempt to provoke India.
If India… pic.twitter.com/dPkuPv6OcG
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 13, 2025