कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेच्या ७ नव्या गाड्यांची व्यवस्था !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने रेल्वे विभागाने पंढरपूरला येणार्‍या भाविकांसाठी १२ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत ७ नव्या रेल्वेगाड्या चालू केल्या आहेत. वारीसाठी रेल्वेने ५० सहस्रांहून अधिक भाविक पंढरपूर येथे येतील, असा अंदाज रेल्वेच्या अधिकार्‍यांनी वर्तवला आहे.

कार्तिकी यात्रेसाठी लातूर-पंढरपूर, मिरज-पंढरपूर, लातूर-मिरज, बिदर-पंढरपूर-मिरज, अदिलाबाद-पंढरपूर, नांदेड-पंढरपूर आणि सांगली-पंढरपूर या नव्या रेल्वेगाड्या चालू करण्यात आल्या आहेत.