संभाजीनगर – विजयादशमीच्या दिवशी सर्वत्र रावणाचे दहन केले जाते; मात्र जिल्ह्यातील करोडी येथील पत्नीपीडित पुरुष आश्रमात रावणाची बहीण शूर्पणखा हिचे प्रतिमा दहन करून महिलांमधील अपप्रवृत्तींचा निषेध व्यक्त करण्यात आला.
रावणाची प्रतिमा सिद्ध करून जाळल्याने जर पुरुषांची वाईट वृत्ती जळत असेल, तर महिलांमधील वाईट वृत्ती जळून जाणेही आवश्यक आहे. त्यामुळे महापंडित असणार्या रावणाचे दहन होत असेल, तर रावणाच्या बहिणीच्या वाईट वृत्तीचे दहन होणेही आवश्यक आहे. त्यामुळे प्रतिवर्षी तिचे दहन केले जाते, अशी माहिती ‘पत्नीपीडित आश्रमा’चे अध्यक्ष भारत फुलारी यांनी दिली.