राज्यातील मालमत्ता करावरील दंड १२ टक्के करणार !

नवी मुंबई – राज्यातील मालमत्ताकर थकबाकीदारांना २४ टक्क्यांऐवजी १२ टक्के दंड लावण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत घेण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

नवी मुंबई शहराची लोकसंख्या १५ लाख आहे. भविष्यात शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण अल्प पडणार असल्याने धरणाची उंची वाढवण्याचे प्रयत्न करणे, खोपोलीवरून टाटाची वीजनिर्मिती करून वाया जाणारे पाणी बंधार्‍याद्वारे अडवून नवी मुंबईला आणणे असे निर्देश पवार यांनी आयुक्तांना दिले.