घाटकोपर (मुंबई) येथील श्री. बबन वाळुंज (वय ६२ वर्षे) यांना रुग्णाईत असतांना रुग्णालयांविषयी आलेले कटू अनुभव

‘प्रत्येक रुग्णालय हे ‘रुग्णसेवा’ या ब्रीदपासून दूर जाऊन ते वैद्यकीय धंद्याचा अड्डा झाल्याचे लक्षात आले. ‘सर्वसाधारण माणसाने पोलीस किंवा अधिवक्ता यांच्यापासून दूर रहावे’, अशी म्हण आहे. त्याप्रमाणेच ‘रुग्णालयाची पायरीही चढू नये’, हे मला अनुभवायला आले.’

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/497827.html

श्री. बबन वाळुंज

आ. दुसर्‍या रुग्णालयात गेल्यावर उद्वाहक (लिफ्ट) बंद असल्यामुळे २ माळे चढून जावे लागणे आणि तेथे गेल्यावर ‘रुग्णालयात भरती करून घेण्यासाठी आधुनिक वैद्यांना भ्रमणभाष करत आहोत, तोपर्यंत थांबावे लागेल’, असे सांगण्यात येणे : मी दुसर्‍या रुग्णालयात गेलो. ते चौथ्या माळ्यावर होते. आम्ही उद्वाहकामध्ये (लिफ्टमध्ये) गेल्यावर ते दुसर्‍या माळ्यावर जाऊन थांबले. माझ्या छातीतील वेदना वाढत होत्या. मला पुढे २ माळे चढून जावे लागले. तेथील कर्मचार्‍यांनी मला रुग्णालयात भरती करून घेण्यास नकार दिला. माझ्या पत्नीने त्यांना काकुळतीने सांगितले. तेव्हा त्यांनी ७०० रुपये घेऊन मला ५ गोळ्या दिल्या आणि ‘भरती करून घेण्यासाठी आम्ही आधुनिक वैद्यांना भ्रमणभाष करत आहोत. तोपर्यंत तुम्हाला थांबावे लागेल’, असे सांगितले.

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/498555.html

– श्री. बबन वाळुंज, घाटकोपर, मुंबई.