मंत्री राणे आज उमेदवारी अर्ज भरणार

मंत्री नारायण राणे १९ एप्रिल या दिवशी उमेदवारी अर्ज प्रविष्ट करणार आहेत. आता महायुतीचे नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात थेट लढत होणार आहे.  

Lok Sabha Voting : लोकसभेसाठी १९ एप्रिल या दिवशी पहिल्या टप्प्यातील मतदान !

पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल या दिवशी होत आहे. या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांमधील १०२ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे.

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांचे हात भ्रष्टाचारात गुंतल्याचा अहवाल !

मालदीवमध्ये संसदेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असतांना एक अहवाल फुटला आहे. या अहवालात राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.

निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखा ! – सर्वोच्च न्यायालय

निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखा. जे अपेक्षित आहे, ते होत नाही, अशी कुणालाच भीती वाटू नये, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे.

महाराष्ट्रात मतांसाठी पैसे, मद्य, अमली पदार्थ यांचा मोठ्या प्रमाणात वापर !

निवडणुकीच्या काळात घातलेल्या धाडींमध्ये नियमित सरासरी १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच घोषित केले आहे.

महाराष्ट्रातील ६ सहस्र ६३० मतदार प्रथमच घरबसल्या मतदान करणार !

महाराष्ट्रात दिव्यांग आणि वृद्ध मिळून ६ सहस्र ६३० मतदार गृहमतदान सुविधेचा लाभ घेऊन घरातूनच मतदान करणार आहेत.

निवडणूक आयोगाने जानेवारी मासापासून देशभरातून जप्त केले १२ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे

जप्त करण्यात आलेले पैसे इतके असतील, तर जप्त न केलेले पैसे  किती असतील ?, याची कल्पनाच करता येत नाही ! यातून भारतातील निवडणूक कशा पद्धतीने लढवली जाते ?, हे स्पष्ट होते !

संपादकीय : असदुद्दीन ओवैसींना कट्टर आव्हान ! 

हिंदू संघटित झाल्यास देशभरातील निधर्मी आणि हिंदुद्वेष्ट्या नेत्यांना मतपेटीच्या माध्यमातून कायमचे हद्दपार करू शकतात !

समान नागरी कायद्याचा पुनरुच्चार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत १४ एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठीचे घोषणापत्र प्रकाशित केले आहे. या घोषणापत्रामध्ये समान नागरी कायदा करण्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.

निवडणुकांवर सहस्रो कोटी रुपयांचा खर्च आवश्यक आहे का ?

मागील लोकसभा, म्हणजे वर्ष २०१९ च्या निवडणुकीचा व्यय ६० सहस्र कोटी रुपये एवढा अवाढव्य झाला होता. त्यापूर्वीच्या म्हणजे वर्ष २०१४ मध्ये निवडणुकांवर ३० सहस्र कोटी रुपये व्यय झाला होता, म्हणजे मागील निवडणुकांच्या तुलनेत वर्ष २०१९ मधील व्यय दुप्पट झाला.