हा पैसा उत्तरदायींकडून वसूल करा !
वर्ष १९६२ ते २०२० या ६१ वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील बर्याच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांमध्ये एकूण ९ सहस्र ६१० कोटी ३२ लाख रुपयांचा अपहार झाला आहे.
वर्ष १९६२ ते २०२० या ६१ वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील बर्याच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांमध्ये एकूण ९ सहस्र ६१० कोटी ३२ लाख रुपयांचा अपहार झाला आहे.
मुंबईसह उपनगरांतील ६५ टक्के बार-मद्यालयांना देवता, संत आणि ऐतिहासिक गड-दुर्ग यांची नावे आहेत. अशा नावांमध्ये पालट करणे शक्य नसल्याचा कांगावा करत उत्पादन शुल्क विभागाने याविषयीचा शासन आदेश रहित करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सरकार भारतीय पुरोहितांना व्हिसा देत नाही. त्यामुळे ब्रिटनमधील अनुमाने ५०० मंदिरांपैकी ५० मंदिरे बंद करण्यात आली आहेत. उर्वरित अनेक मंदिरांमधील कामे ठप्प झाली आहेत.
संयुक्त अरब अमिरात या वाळवंट असणार्या इस्लामी देशातील दुबईसह काही शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. देशात हिंदु मंदिर बांधल्यामुळे तेथे ही स्थिती निर्माण झाल्याचा प्रसार धर्मांधांकडून सामाजिक माध्यमांतून केला जात आहेत.
हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील बीव्हीबी महाविद्यालयाच्या परिसरात प्रेमप्रकरणातून काँग्रेसच्या नगरसेवकाची मुलगी नेहा हिरेमठ हिची फैयाज याने चाकूने भोसकून हत्या केली.
रामनवमीच्या दिवशी बंगालमध्ये ३ ठिकाणी हिंसाचार झाला. मुर्शिदाबाद येथे छतांवरून मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. गावठी बाँब फोडण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. तिन्ही ठिकाणी झालेल्या हिंसाचारात १८ जण घायाळ झाले आहेत.
म्यानमारच्या अराकान प्रांतातील बुथिदुआंग येथे १ सहस्र ६०० हून अधिक हिंदू आणि १२० बौद्ध धर्मियांना रोहिंग्या मुसलमानांच्या सशस्त्र संघटनेने ओलीस ठेवल्याचे वृत्त ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने प्रसारित केले आहे.
रांची (झारखंड) येथे श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात येणार्या मिरवणुकीच्या मार्गावर पोलिसांनी ड्रोन कॅमेर्याद्वारे पहाणी केली असता १० घरांच्या छतांवर मोठ्या संख्येने दगड गोळा करून ठेवण्यात आल्याचे दिसून आले. पोलिसांनी घरमालकांना दगड हटवण्याचा आदेश दिला आहे.
पाकिस्तानमध्ये एका शीख व्यक्तीला शिखांचा सण बैसाखी साजरा केल्यावरून नग्न करून मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडिओ पाकमधील जिहादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ने (टी.एल्.पी.ने) बनवला आहे.
पंजाबमधील रूपनगर जिल्ह्यात विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी विकास प्रभाकर यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. दोघे आक्रमणकर्ते दुचाकीवरून आले होते. हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.