अक्षय्य तृतीयेला ‘सत्पात्रे दान’ करून ‘अक्षय्य दाना’चे फळ मिळवा !

‘अक्षय्य तृतीया’ म्हणजे हिंदु धर्मातील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवशी केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचे फळ मिळतेच, त्यामुळे अनेक जण या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतात.

गुढीपाडव्याचे आरोग्य विधान !

चैत्र मासापासून उन्हाचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे ऋतुजन्य व्याधी जसे की, मुरूम-पुटकळ्या, फोडे, घामोळ्या आणि इतर त्वचारोगांपासून रक्षणासाठी कडुलिंबाचे सेवन उपयोगी असते.

हिंदूंनो, धर्माचरण करून गुढीपाडव्याचा सण सात्त्विक पद्धतीने साजरा करूया आणि स्वत:तील धर्मतेज जागवूया !

सुती किंवा रेशमी नऊवारी साडी आणि धोतर यांमध्ये पुष्कळ सात्त्विकता अन् चैतन्य असल्यामुळे ही वस्त्रे परिधान करणार्‍यांनाही सात्त्विकता, तसेच चैतन्य यांचा लाभ होण्यास साहाय्य होेते.

ब्रह्मध्वज पूजा-विधी

‘गुढीचे पूजन शास्त्रानुसार कसे करावे ?’ हे मंत्रांसह वाचकांसाठी येथे देत आहोत. प्रत्यक्ष गुढी ज्या ठिकाणी उभारावयाची आहे, त्या ठिकाणी गुढी उभारून हे पूजन करावे.    

गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करतात. शरिराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे आणि नंतर ऊन (गरम) पाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान. अभ्यंगस्नान करतांना देशकालकथन करावे लागते.

रंगपंचमी साजरी करण्यामागील शास्त्र आणि उद्देश

सण-उत्सवांमध्ये घुसडले गेलेले अपप्रकार रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे अपरिहार्य !

शिवलिंगातील चैतन्य विज्ञान !

शिवलिंग हे एक यंत्र आहे. त्याला निरनिराळे रंग जर आणावयाचे असतील, तर विशिष्ट प्रकारचे मंत्र म्हणावे लागतात. मंत्र ही एक शक्ती आहे. प्रत्येक शब्दात, प्रत्येक अक्षरात, त्याच्या उच्चारांत, मंत्रसंख्येत सामर्थ्य निर्माण करण्याची शक्ती आहे.

‘रथसप्तमी’ या तिथीचे आध्यात्मिक महत्त्व !

सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे जीवन सूर्यावर अवलंबून आहे; कारण सूर्य हा तेज (ऊर्जा) आणि प्रकाश हे दोन्ही देतो. माघ शुक्ल सप्तमीला (१६.२.२०२४ या दिवशी) ‘रथसप्तमी’ झाली. या दिवशी सूर्यदेवाच्या रथाची प्रतिमा बनवून तिचे पूजन केले जाते.

‘रथसप्तमी’ या तिथीचे आध्यात्मिक महत्त्व !

‘सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे जीवन सूर्यावर अवलंबून आहे; कारण सूर्य हा तेज (ऊर्जा) आणि प्रकाश हे दोन्ही देतो. माघ शुक्ल सप्तमीला ‘रथसप्तमी’ आहे. या दिवशी सूर्यदेवाच्या रथाची प्रतिमा बनवून तिचे पूजन केले जाते. ‘रथसप्तमी’ तिथीचे आध्यात्मिक महत्त्व आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया.

मकरसंक्रांत

‘या दिवशी केले जाणारे तीर्थस्नान, दान पुण्यकारक मानले आहे; म्हणूनच तिळाप्रमाणे स्निग्धता आणि गुळाप्रमाणे गोडवा याचे प्रतीक म्हणून तीळगूळ देऊन परस्परातील स्नेह अन् माधुर्य वाढवावे’, असा संदेश देणारा, समाजाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असा हा सण सर्वत्र उत्साहाने साजरा करतात.