काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी ४ वर्षांचा कारावास !

कोळसा घोटाळा हा ११ वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे या घोटाळ्यामुळे पोळलेल्या सामान्य माणसांना ‘उशिराने मिळालेला न्याय हा अन्याय’, असे वाटल्यास चूक ते काय ?

(म्हणे) ‘मणीपूरमधील पीडित महिलांना न्याय देण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांना आमचा पाठिंबा !’-अमेरिका

भारतातील अंतर्गत प्रश्‍नांविषयी सोयीस्कर भूमिका घेणारी अमेरिका लव्ह जिहादमुळे भारतातील लक्षावधी हिंदु मुलींचे जीवन उद्ध्वस्त होण्यावर चकार शब्दही काढत नाही, हे जाणा !

पुढील ३ दिवस देशातील २२ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता !

दक्षिण आणि किनारी ओडिशातील अनेक भागांत मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. मच्छिमारांना २७ जुलैपर्यंत समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे.

विरोधकांचा केंद्र सरकारविरुद्धचा अविश्‍वास प्रस्ताव लोकसभेच्या अध्यक्षांनी स्वीकारला !

मणीपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी विरोधी पक्षांनी लोकसभेमध्ये २६ जुलै या दिवशीही केंद्र सरकारवर टीका करत मोदी सरकारच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव मांडला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तो स्वीकारून ‘चर्चेचा दिनांक नंतर निश्‍चित केला जाईल’, असे सांगितले.

अंजूसारखे मी पाकमध्ये केले असते, तर मला ठार मारले असते ! – सीमा हैदर

राजस्थानच्या भिवाडी येथील अंजू या विवाहित ख्रिस्ती महिलेने पाकिस्तानमध्ये जाऊन तिच्या प्रियकराशी विवाह केला आहे. तिने इस्लाम धर्मही स्वीकारला आहे. विशेष म्हणजे अंजू हिंदु होती आणि नंतर ती ख्रिस्ती झाली होती.

‘इंडिया’ नावाचा वापर करून लोकांची दिशाभूल करता येणार नाही ! – पंतप्रधान

आज जगामध्ये भारताची प्रतिमा सुधारली आहे. वर्ष २०४७ पर्यंत आपण देशाला विकसित देश बनवू. जनतेच्या पाठिंब्याने भाजप वर्ष २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येईल.

भारताने चीनच्या इलेक्ट्रिक चारचाकी आस्थापनाच्या गुंतवणुकीला दिला नकार !

बीवायडी हे आस्थापन सध्या तिची २ इलेक्ट्रिक वाहने भारतात विकत आहे, तसेच इलेक्ट्रिक बसच्या संदर्भात भारतातील ओलेक्ट्रा ग्रीनटेक या आस्थापनाला तांत्रिक साहाय्य करत आहे.

रा.स्व. संघाचे माजी सह-सर कार्यवाह मदनदास देवी यांचे निधन !

मदनदास देवी हे जवळपास ६ दशके रा.स्व. संघाचे प्रचारक होते. त्यांनी संघाचे सह सरकार्यवाह म्हणूनही काम पहिले होते. मदनदास देवी यांनी संघ आणि भाजप यांच्यात समन्वयक म्हणून काम केले होते.

‘ओपेनहायमर’ चित्रपटातून श्रीमद्भगवद्गीतेचा अवमान होणार्‍या प्रसंगाला अनुमती कशी दिली ?

सेन्सॉर बोर्ड केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना त्याच्याकडून अशा प्रकारच्या चुका कशा होतात ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात नेहमीच उपस्थित होतो.

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून  २६ जुलैपर्यंत स्थगिती !

सर्वेक्षणाचे हे काम आता स्थगित झाले असले, तरी त्याला पुन्हा अनुमती मिळाल्यास ते चालू करण्यात येणार आहे. केवळ वैज्ञानिक सर्वेक्षण असेल, ते लवकर पूर्ण होऊ शकते; मात्र जर खोदकाम करायचे असल्यास त्याला अधिक काळ लागू शकतो.